पुणे: शहराच्या स्वारगेट, व पुलाची वाडी भागातील नदी पात्रात विसावलेल्या शेकडो नागरीकांना बंदच्या काळात रोज जेवण पुरवण्यात येणार आहे.
शट डाउन च्या काळात कोणताही आधार नसलेले, काहीच काम मीळत नसलेल्या शेकडो बेघर नागरीकांना बांधकाम व्यावसाईक विक्रम व प्रशांत अगरवाल, रणरागिनी महीला संघटनेच्या उज्वला गौड, सचिन चव्हाण, सलीम केटरिंग चे व्यवस्थापक यासिनभाई, बाबा, आनंद रसकोंडा, व पोलीसदलातुन बडतर्फ करण्यात आलेले शैलेश जगताप व परवेज जमादार यांनी या नागरिकांना बंद असे पर्यंत जेवण पुरवण्याचा विडा उचलला आहे. या सर्वांनी या करीता पोलीसांना विनंती केली आहे की या कामात त्यांना मदत करावी, कारण या बेघर नागरीकांना आजच सावरले नाही तर पुढील काही दिवसात यांच्यावर भयंकर परिस्थीती ओढावेल. कारण हे सर्व नागरीक आज रस्त्यावर जीवन जगत आहेत. आजच यांना सावरणे गरजेचे आहे.
सामाजीक अंतर ठेवण्याचे बंधन पाळुन हे सर्व सामाजीक कार्यकर्ते करोना नावाचा भयंकर रोग न पसरण्याबाबत या बेघर नागरीकांना अवगत व शिक्षीत करत आहे, जेणेकरुन हे सर्व बेघर या बाबत याची कटाक्षाने काळजी घेतील व आहे त्या स्थानावर विसावतील.