पारोळा (प्रतिनिधी): सद्या जगभरात कोरोना संसर्गाने मोठ्या प्रमाणात वाढ होत असली तरी भारतात लाॅकडाऊनच्या नियमांचे पालन केल्याने बहुतांश शहरे व तालुक्यात नियंत्रण ठेवण्यात आज पर्यंत यश आले असले तरी त्यात पारोळा तालुक्याच्या आराध्य ग्रामदैवत प्रभु श्री बालाजी महाराजाच्या पुण्य पावण स्पर्शाने व जनतेच्या सहकार्याने पुढील येणारा काळही चांगला निरोगी जावो हीच प्रार्थना
देशांमध्ये कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी २५ टक्के नौकर वर्गावर काम केले जात असल्याने संपूर्ण अर्थ चक्र हे मंदावले असुन त्यात कोरोनाच्या संसर्गाने उद्योग व्यवसायात नौकरदार वर्गावर उपास मारीची वेळ आल्याने मोठं मोठ्या शहरान मधुन उर्वरीत नौकर वर्ग हा मिळेल त्या वाहनाने पायी सांयकलीने आपल्या गावांकडची वाट धरली आहे.
आज गावाकडे येणार्या जाणार्या नागरिकांनी आपल्या गांवी प्रवेश करण्या आधी आपल्या जिल्हा , तालुका आरोग्य विभागात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी मगच आपल्या गावांत घरी जावे कारण तुम्ही ज्या मोठ्या शहरांतुन प्रवास करून येत आहेत त्यात तुम्हांला होणार्या त्रासाने ज्या गावात घरात कोरोनाची लागणं नाही त्याठिकाणी लागणं होऊ शकते आपल्या एका छोट्यांशा चुकि मुळे परिवाराला व गावाला या आजराशी लढावे लागेल व जन जीवण विस्कळीत होईल त्यामुळे सर्वानी तपासणी करून काळजी घेऊनच घरी जावे व घरी आल्यानंतर आपल्या परिवाराची , गावाच्या व आपल्या स्वताःच्या दक्षतेसाठी आपण घरात एका खोलीत १४ दिवस काॅरन्टाईन करून घरात कोणाशीही जवळ जाऊन बोलु नये कारणं कोरोनाची लक्षणे लगेच दिसत नाही त्यामुळे आपण व आपला परिवारही सुरक्षित राहील यांची सर्वानी काळजी घ्यावी कारण एका मुळे घर व घरा मुळे गांवात लागणं लागायला वेळ लागत नाही त्यांचे उदाहरण म्हणजे अमळनेर, पारनेर, अशी अनेक गावात असेच घडले असल्याचे आपण ऐकतो वाचतो तरी पण लोकं बाहेर गावांहुन जर कोणी आले असेल तर त्यांची आपण तपासणी करूनच घरी येऊ द्या व आपल्या तालुका पोलिस स्टेशन, नगरपालिका, ग्रामपंचायत, पोलिस पाटील यांना तपासणी व गावात आल्याची माहिती द्या
कारणं या आजारावर जोपर्यंत औषध येत नाही तोपर्यंत आपण महत्वाच्या कामाशिवाय बाहेर गांवी जाऊ येऊ नये तरी सर्वानी दक्षतेने वागावे असे आवाहन दर्पण समुहाचे अध्यक्ष विजय नावरकर यांनी केले आहे.