Home ताज्या बातम्या कोकणात येणारे पाणी इतरत्र वळवण्याचे घाट -सुनील तटकरे

कोकणात येणारे पाणी इतरत्र वळवण्याचे घाट -सुनील तटकरे

अलिबाग-प्रतिनिधी

 कोकणात येणारे पाणी इतरत्र वळवण्याचे घाट राज्य शासनाने घातले आहे. पण सरकारचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, अशी इशारा रायगड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहे. ते अलिबागेत पत्रकारांशी बोलत होते. 

कोयना आणि मुळशी धरणातील पाणी कोकणव्यतिरिक्त इतरत्र वळविणे म्हणजे काय करावे याची काळजी घ्यावी. या समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे. त्यानुसार हे पाणी पूर्वेकडे वळवण्याचे सरकारचे डाव असेल तर तटकरे यांनी आरोप केला आहे. सरकारच्या भूमिकेमुळे कोकणातील पाणी समस्या गंभीर होईल. शिवाय येथे जलविद्युत प्रकल्प बंद होतील, असा दावाही तटकरे यांनी केला आहे.

‘जनशताब्दीला खेड थांबा द्या’

दरम्यान, कोकण रेल्वेवरील जनशताब्दी एक्स्प्रेसला खेड स्थानांत थांबा द्या, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केले. त्यांनी नवी मुंबईतील कोकण रेल्वेच्या मुख्यालयात वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेतली. दरम्यान कोकण रेल्वेला जमीन देऊन विस्थापीत झालेल्या प्रकल्पग्रस्तांना रेल्वेच्या नोकरीत सामावून घेण्याची मागणी त्यांनी केली. कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्यासोबत कोकण रेल्वेच्या समस्या तसेच अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली.यावेळी रेल्वेतील सुरक्षा, खेड दिवाणखवटी तसेच कोलाड येथील प्लॅटफाॅर्म्सची उंची वाढवणे, रत्नागिरीतील शिरवली स्थानकावर रेल्वे क्राॅसिंगसाठी ओव्हर ब्रीज बांधणे तसेच गणेशोत्सवासाठी विशेष गाडी सुरू करणे याबाबतचया मागण्या तटकरे यांनी केल्या आहेत.  त्यावर दीर्घ चर्चा करण्यात आली. कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना या प्रकल्पात सामावून घेण्याच्या विषयावरही चर्चा झाली. त्याचसोबत पनवेल-चिपळूण इएमओ रेल्वे सुरू करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली