[ad_1]
लेट इंडिया ब्रीद या व्यासपीठातर्फे डोण्ट चोक मुंबई असे म्हणत या हरकती आणि सूचना नागरिकांपर्यंत पोहोचवून त्या माध्यमातून महापालिकेपर्यंत ई-मेलच्या माध्यमातून पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच वैयक्तिक पातळीवर स्वतंत्रपणे या हरकती महापालिका, पर्यावरणमंत्री, खारफुटी विभाग यांच्यापर्यंतही पोहोचवल्या आहेत.
या जनसुनावणीदरम्यान प्रकल्पाच्या पर्यावरण आघात मूल्यांकनाकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही, अशी हरकत पर्यावरणप्रेमींनी नोंदवली आहे. हा मूल्यांकन अहवाल जनसुनावणीपूर्वी पालिकेच्या वेबसाइटवर लोकांसाठी उपलब्ध करण्याची गरज होती, मात्र तो जनसुनावणीच्या दिवसांपर्यंत उपलब्ध नव्हता असे लेट इंडिया ब्रीदचे यश मारवा यांनी सांगितले. हा अहवाल पर्यावरण मंत्रालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मिळेल असेही जनसुनावणीदरम्यान सांगण्यात आले. मात्र सध्या लोकांना प्रवासाची मुभा नाही या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे अहवाल वाचून हरकती नोंदवण्यासाठी २ मेपर्यंतचा कालावधी अपुरा आहे, हे प्रशासनाने लक्षात घेणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
देवनार डम्पिंग ग्राऊंड परिसरामध्ये ९ लाख लोक राहतात. माहुलच्या लोकांचा अनुभव लक्षात घेता हा प्रकल्पही धोकादायक ठरू शकेल अशी भीती वर्तवण्यात येत आहे. तसेच जागतिक स्तरावर कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पांचे आता दुष्परिणाम समोर येत असताना मुंबईमध्ये त्याच पर्यायाचा अवलंब करण्याचे कारण काय, असाही प्रश्न विचारण्यात येत आहे.
साकल्याने विचार व्हावा
यामध्ये कचरावेचक घटकालाही समाविष्ट करून घ्यायला हवे होते. कचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भातील अनेक बाबी ज्या घटकांना माहीत आहेत त्यांच्याशी चर्चा गरजेची आहे, अशी हरकत नोंदवण्यात आली आहे. या संदर्भात पर्यावरणीय अभ्यास करून चर्चेसाठी किमान ३० दिवसांचा कालावधी मिळावा आणि यातही कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा साकल्याने आणि सर्वांगाने विचार व्हावा असे सुचवण्यात आले आहे.
[ad_2]
Source link