‘ममता दीदींनी दाखवून दिलं मोदी- शहांनाही पराभूत करता येऊ शकतं’
पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला दोन तृतीयांश बहुमत मिळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. ही निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपचे देशभरातील प्रमुख कार्यकर्ते प्रचारात उतरले होते. तेथील सत्ता काबीज करावी, या दृष्टीने भाजप रिंगणात उतरला होता. पण जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसवर विश्वास दाखवत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.