‘महाराष्ट्रातील करेक्ट कार्यक्रम योग्य वेळी होईल. करोनाच्या काळात सरकारला आम्ही साथ देतोय. त्यामुळं आज ही चर्चा मी करत नाही. पण काय घडलं ते योग्य वेळी तुम्हाला कळेलंच,’ असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ममता जिंकल्या! आता करोनाकडे लक्ष देऊया: उद्धव ठाकरे
‘पश्चिम बंगालच्या जनतेबरोबर महाराष्ट्राची जनता जिगरबाज आहे. म्हणून भाजपसोबत तुम्हाला निवडणून दिलं होतं. पण तुम्ही त्यांच्यासोबत विश्वासघात केला आणि त्या जिगबाज असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला निवडून न दिलेले सरकार दिलं,’ असा टोला फडणवीस यांनी यावेळी शिवसेनेला लगावला आहे.
‘गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडीच्या भोंगळ कारभाराला आरसा दाखवण्याचे काम पंढरपूरच्या जनतेनं केलंय. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतरची ही पहिलीच निवडणुक आहेत. या निवडणुकीत ज्या प्रकारे तिन्ही पक्ष उतरले. साम, दाम दंड भेद असे सगळे प्रकार वापरले, मोठ्या प्रमाणात पैशाचा दुरुपयोग केला, प्रशासनाचा गैरउपयोग केला. हे सगळं केल्यानंतर देखील भाजपला लोकांनी निवडून दिलं आहे,’ असं म्हणत फडणवीस यांनी विजयाबद्दल प्रतिक्रिया केली आहे.
पंढरपुरात महाविकास आघाडीला धक्का; भाजपचे अवताडे यांचा निसटता विजय
महाविकास आघाडीचे नेते म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना
‘पश्चिम बंगालमध्ये आमच्या अपेक्षेनुसार जागा आल्या नसल्या तरी ३ जागांवरुन आम्ही मारलेली मजल ही देखील मोठी गोष्ट आहे. बंगाल हा कम्युनिस्ट व काँग्रेसमुक्त झाला असून बंगालमध्ये आता भगव्यांचा बोलबाला सुरु झाला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी बंगालच्या निकालावर दिली आहे. तसंच, बंगालच्या निकालानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया बघून ‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’ ही म्हण आज मी बघतोय. संजय राऊत यांच्यासह सर्वच महाविकास आघाडीचे नेते बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना सारखे वागत आहेत,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.