[ad_1]
हायलाइट्स:
- ‘मदर इंडिया’ मधून घरोघरी पोहोचल्या होत्या नर्गिस
- राज कपूर यांनी अट मान्य न केल्याने तुटलं होतं नातं
- संजय दत्त आहे नर्गिस आणि सुनील दत्त यांचा मुलगा
आता दाढी करा आणि ज्या चुका केल्यात त्या निस्तरायला सुरुवात करा; प्रकाश राज यांचा मोदींना टोला
नर्गिस आणि राज कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. आवडत्या जोडींपैकी एक अशी त्यांची जोडी होती. खऱ्या आयुष्यातही दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. परंतु, राज कपूर यांचं पूर्वीच लग्न झालं होतं. नात्याला नऊ वर्ष झाल्यावर नर्गिस यांनी राज कपूर यांना त्यांच्या पत्नीला घटस्फोट देण्यास सांगितला. परंतु, राज यांनी स्पष्ट नकार दिला. यानंतर नर्गिस यांनी राज यांच्यासोबतच नातं संपवलं. त्यानंतर नर्गिस यांच्या आयुष्यात आले अभिनेते सुनील दत्त.
हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड मानला जाणारा चित्रपट ‘मदर इंडिया’ मध्ये नर्गिस आणि सुनील यांची मुख्य भूमिका होती. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नर्गिस सुनील यांच्याशी फार बोलत नसत. परंतु, एकेदिवशी चित्रीकरणादरम्यान घडलेल्या घटनेत सुनील यांनी जीव धोक्यात घालून नर्गिस यांचा जीव वाचवला होता. त्यानंतर नर्गिस आणि सुनील यांच्यात मैत्री झाली. त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर नंतर लग्नात झालं. १९५८ साली त्यांनी लग्न केलं. त्यांना तीन मुलंही झाली. संजय दत्त, प्रिया दत्त आणि नम्रता दत्त. १९८० साली त्या आजारी पडल्यानंतर त्यांच्या आजाराचं निदान झालं. त्या दहा महिने कर्करोगाशी झुंज देत होत्या. मात्र या आजारात त्यांचं निधन झालं. नर्गिस यांच्या निधनावेळी संजय दत्त फक्त २२ वर्षांचा होता.
[ad_2]
Source link