[ad_1]
करोनाचा संसर्ग मुंबई आणि उपनगरांत काही अंशी कमी होत असल्याचे आकडेवारीतून समोर येत असले तरी करोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने १ ते १५ मे पर्यंत लॉकडाउनचा दुसरा टप्पा वाढवला आहे. मात्र, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तिन्ही शहरांत सकाळी ११ पर्यंत साहित्यखरेदी करण्यासाठी असलेल्या शिथिलतेच्या काळात नागरिकांची सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडत आहे.
तिन्ही शहरांतील चौकाचौकांमधील खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवरील गर्दी, भाजी मार्केटमध्ये सुरक्षित अंतराच्या नियमांना फासलेला हरताळ यामुळे संसर्गाचा धोका वाढत आहे. तर दुसरीकडे ज्या दुकानांना पूर्णपणे लॉकडाउनचे निर्बंध आहेत, असे कपडे, इलेक्ट्रॉनिक्स साहित्याची दुकाने, मोबाइल या दुकानांचाही कारभार बिनधास्त सुरू आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पंखा, एसी खरेदी करण्यासाठी अनेक दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. त्यात ११ नंतर पोलिस दुकाने बंद करण्याचे आवाहन करत असले तरी नंतरही अंबरनाथ, बदलापूरमधील दुकानदार केवळ नावाला शटर खाली करत आपला व्यवसाय सुरूच ठेवत आहेत. दुकानांच्या बाहेर एक कामगार उभा करत ग्राहक आल्यास, शटर उघडून ग्राहकांना दुकानात पाठवले जात आहे. हीच परिस्थिती उल्हासनगरमधील कपडे तसेच विविध साहित्यांच्या बाजारपेठांबाबत आहे. नागरिकांना बाजारपेठेपर्यंत जाण्याची रिक्षाची सेवा उपलब्ध आहेच.
त्यामुळे करोनाचा संसर्ग कमी होण्या ऐवजी येत्या दिवसांत पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात पालिकेच्या पथकाकडून अशा व्यापाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित असताना केवळ एका रिक्षावर भोंगा लावून नागरीकांना जनजागृती करण्यातच पालिका समाधानी आहे. अंबरनाथ शिवाजी चौकातील पोलिस चौकीसमोरच सर्व नियम पायदळी तुडवत दुकानदार आपला व्यवसाय करत असतानाही पोलिसही कानाडोळा करत आहेत.
[ad_2]
Source link