Home शहरे मुंबई ‘प्रकाश जावडेकर यांच्यासारखे नेते महाराष्ट्राचा अपमान करत आहेत’; काँग्रेसची टीका

‘प्रकाश जावडेकर यांच्यासारखे नेते महाराष्ट्राचा अपमान करत आहेत’; काँग्रेसची टीका

0
‘प्रकाश जावडेकर यांच्यासारखे नेते महाराष्ट्राचा अपमान करत आहेत’; काँग्रेसची टीका

[ad_1]

हायलाइट्स:

  • प्रकाश जावडेकर यांच्यावर काँग्रेसचा पलटवार
  • जावडेकर महाराष्ट्राचा अपमान करत असल्याचा आरोप
  • सचिन सावंत यांनी ट्वीट करून साधला निशाणा

मुंबई : करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले असताना केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद रंगत आहे. लसींचा अपव्यय केल्याचा आरोप करत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (BJP Prakash Javdekar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. या आरोपाला काँग्रेसनंही (Congress) जोरदार प्रत्युत्तर दिलं असून प्रकाश जावडेकर यांच्यासारखे नेते महाराष्ट्राचा अपमान करत असल्याचं म्हटलं आहे.

‘प्रकाश जावडेकरजी, महाराष्ट्रातील लशींचा अपव्यय ०.२२ टक्के आहे, तुमच्या खोटेपणानुसार ६ टक्के नाही. मोदी सरकारच्याच माहितीने तुमचा खोटारडेपणा उघड झाला. आम्हाला आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे ज्यांनी लसीकरणात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवले व लसींचा कमीतकमी अपव्यय ठेवला,’ असं ट्वीट काँग्रेस प्रवक्ते सचिन सांवत यांनी केलं आहे.

‘भाजप नेत्यांकडून महाराष्ट्राचा अपमान होत असल्याचं दु:ख’

सचिन सावंत यांनी प्रकाश जावडेकर यांच्यावर पलटवार करताना त्यांना एक सल्लाही दिला आहे. ‘दु:ख याचे वाटते की भाजपचे तुमच्यासारखे नेते राजकारणासाठी महाराष्ट्राचा अपमान व निंदा करत आहेत. गंभीर बाब – महाराष्ट्रात फक्त २३ हज्र ५४७ लसी शिल्लक आहेत. मोदीजी वेळेवर लसी देत नसतील तर आम्ही जनतेची सेवा कशी करावी? महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा मोदींना लशी देण्यास सांगा,’ असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

‘भाजपचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ’

‘भाजपचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ अशी परिस्थिती आहे. जो यांना आरसा दाखवतो त्याच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली जाते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी, मनमोहन सिंहजी व राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या चुका दाखवण्याचा, सल्ला देण्याचा प्रयत्न केला त्यावर लगेच मोदी सरकारच्या मंत्र्यांनी मुजोरपणे टीका केली. काँग्रेस नेत्यांचा सल्ला वेळीच ऐकला असता तर देश आर्थिकदृष्ट्या उद्धवस्त झाला नसता, लाखो संसार उघड्यावर पडले नसते, अनेकांना प्रियजनांना मुकावे लागले नसते, निष्पाप बळी गेले नसते, स्मशानात रांगा लागल्या नसत्या. देशाची नाचक्की झाली नसती,’ अशी खरमरीत टीकाही सचिन सावंत यांनी केली आहे.

[ad_2]

Source link