ट्रोल होण्याच्या भीतीने जान्हवीने इन्स्टा फोटोवर दिलं स्पष्टीकरण
नुकत्याच एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत शक्ती यांनी देशातील या परिस्थितीबद्दल वाईट वाटत असल्याचं म्हंटल. ते म्हणाले, ‘हे वर्ष खूप अडचणी घेऊन आलं होतं आणि अजूनही आपण त्यांना तोंड देतोय. मृत्यू आता आणखी जवळ आला आहे. आधी लोक बोलायचे मरणार आहे, मरायला टेकलाय आणि अशातच दहा वर्ष निघून जायची. पण आता लोक किड्या मुग्यांसारखे मरतायत. मृत्यू काय आहे? आता हे खूप सोपं आहे. मी आताच ऐकलं की, मित्राच्या भावाला सकाळी इस्पितळात घेऊन गेले होते आणि संध्याकाळी तो जिवंत नाहीये. तुम्ही मृत्यू कधी होईल हे सांगू नाही शकत.’
प्रेक्षकांना करोना लस टोचून घेण्याचं आवाहन करत शक्तीजी म्हणाले, ‘आता परिस्थिती हातातून निघून जात आहे. मी करोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि तुम्हीही लवकरात लवकर लस घ्या. फक्त लसचं आपल्याला या परिस्थितीतून बाहेर काढू शकते.’ काही दिवसांपूर्वी शक्ती यांच्या मुलाला सिद्धांत कपूरला करोनाची लागण झाली होती. त्याने करोनावर मात केली होती. त्यानंतर सिद्धांतने प्लाझ्मा दान केला होता व इतरांनाही प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं होतं.
‘ती रक्त पिणारी ताडका,’ कंगनाने साधला ममता बॅनर्जींवर निशाणा