Home बातम्या आंतरराष्ट्रीय west bengal violence : ​’नागरिकांचे प्राण वाचवू न शकणारे कुठलेही सरकार अपयशीच’

west bengal violence : ​’नागरिकांचे प्राण वाचवू न शकणारे कुठलेही सरकार अपयशीच’

0
west bengal violence : ​’नागरिकांचे प्राण वाचवू न शकणारे कुठलेही सरकार अपयशीच’

[ad_1]

कोलकाताः विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार ( west bengal violence ) उफाळून आला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रसच्या गुंडांनी हल्ला करून ९ कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावरून बंगालच्या काळजीवाहू मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना ( mamata banerjee ) लक्ष्य करण्यात आलं आहे. हिंसाचारावरून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनीही ममता बॅनर्जींवर टीका ( asaduddin owaisi ) केली आहे. नागरिकांचे प्राण वाचवणं हे ममतांचं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे, असं ओवैसी म्हणाले.

प्रत्येकाला जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. नागरिकांच्या जीवाचं रक्षण करणं, हे कुठल्याही सरकारचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. सरकार असं करत नसेल तर ते मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरत आहे. देशातील कुठल्याही भागातील नागरिकांच्या प्राणांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरणाऱ्या सरकारचा निषेध आहे, असं ओवैसी म्हणाले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी २ मे रोजी लागले. यानंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिंसाचारातील पीडित कुटुंबीयांची नड्डा भेट घेत आहेत. नड्डा हे उद्या कोलकात्यात धरणे आंदोलन करणार आहेत.

violence in bengal : PM मोदींचा बंगालच्या राज्यपालांना फोन, निवडणूक निकालानंतर हिंसाचार

दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी राज्यपाल जगदीप धनखड यांना फोन करून हिंसाचारावर चिंता व्यक्त केली. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव, पोलिस महासंचालक आणि कोलकात्याचे पोलिस आयुक्त या बैठकीत उपस्थिती असतील.

west bengal violence : ‘लक्षात ठेवा, मुख्यमंत्री आणि TMC नेत्यांनाही दिल्लीत यावं लागतं’

[ad_2]

Source link