पूर्व विदर्भासाठी महत्त्वाचा असलेल्या या विषयाकडे मागील वीस वर्षांपासून नाना पटोले यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयामुळे पूर्व विदर्भातील सर्वसामान्य शेतकरी व शेतमजूरांना मोठा आधार मिळेल तसेच मोहफुलावर आधारित उद्योगांना चालना मिळेल, असे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रवींद्र दरेकर म्हणाले.
प्रदीर्घ लढ्याला मिळाले यश : नाना पटोले
मोहफुलांवरील निर्बंध हटवावे, यासाठी १९९९ पासून संघर्ष करीत होतो. आज या प्रदीर्घ लढ्याला यश आले आहे. या निर्णयाचा विदर्भातील जनतेला मोठा फायदा होणार असून यामुळे प्रक्रिया उद्योग आणि पर्यायाने रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. विदर्भातील वनांसोबत शेतकऱ्यांच्या शेतामध्येही मोठ्या प्रमाणात मोहफुलांची झाडे आहेत. त्या शेतकऱ्यांनाही आता उत्पन्नाचे साधन निर्माण होणार आहे. मोहफुले गोळा करणे व व्यापारावरील जाचक निर्बंध हटवल्याने विदर्भात मोहफुलांच्या झाडांच्या लागवडीला चालना मिळेल. यातून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे रक्षणही होईल, असे पटोले म्हणाले.