Home बातम्या आंतरराष्ट्रीय Covid19: देशात २ कोटी जनसंख्येला कोविडनं गाठलं; २.२६ लाखांहून अधिक मृत्यू

Covid19: देशात २ कोटी जनसंख्येला कोविडनं गाठलं; २.२६ लाखांहून अधिक मृत्यू

0
Covid19: देशात २ कोटी जनसंख्येला कोविडनं गाठलं; २.२६ लाखांहून अधिक मृत्यू

[ad_1]

हायलाइट्स:

  • देशात एका दिवसात लाख ८२ हजार ३१५ करोनाबाधित रुग्णांची भर
  • २४ तासांत ३ लाख ३८ हजार ४३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज
  • २४ तासांत ३७८० जणांनी कोविडमुळे गमावले प्राण

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मंगळवारी (४ मे २०२१) रोजी एकूण ३ लाख ८२ हजार ३१५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत ३७८० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दिवशी तब्बल ३ लाख ३८ हजार ४३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ०६ लाख ६५ हजार १४९ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख २६ हजार १८८ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ६९ लाख ५१ हजार ७३१ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३४ लाख ८७ हजार २२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  • एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ०६ लाख ६५ हजार १४९
  • एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ६९ लाख ५१ हजार ७३१
  • उपचार सुरू : ३४ लाख ८७ हजार २२९
  • एकूण मृत्यू : २ लाख २६ हजार १८८
  • करोना लसीचे डोस दिले गेले : १६ कोटी ०४ लाख ९४ हजार १८८

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २९ कोटी ४८ लाख ५२ हजार ०७८ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १५ लाख ४१ हजार २९९ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात अर्थात मंगळवारी करण्यात आली.

Oxygen Crisis: ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू नरसंहारापेक्षा कमी नाही; हायकोर्टाचे ताशेरे
AP Strain : धोक्याची घंटा! आंध्रात आढळला करोनाचा नवा स्ट्रेन, आधीपेक्षा १५ पट अधिक घातक
राज्यानुसार आकडेवारी

मंगळवारी, महाराष्ट्रात एकूण ५१,८८० करोनाबाधित तर ८९१ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आलीय. महाराष्ट्रात आतापर्यंत ७१,७४२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

राजधानी दिल्लीत १९,९५३ रुग्ण आढळले तर ३३८ करोनामुळे दगावले.

पश्चिम बंगालमध्ये १७,६३९ करोनाबाधित रुग्ण आढळले तर १०७ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय.

छत्तीसगडमध्ये १५,७८५ नवीन रुग्णांची तर २१० मृत्यूंची नोंद करण्यात आलीय.

west bengal violence : ​’नागरिकांचे प्राण वाचवू न शकणारे कुठलेही सरकार अपयशीच’
violence in bengal : PM मोदींचा बंगालच्या राज्यपालांना फोन, निवडणूक निकालानंतर हिंसाचार उफाळला

[ad_2]

Source link