[ad_1]
यासंदर्भात अखिल भारतीय व्यापारी महासंघाने राज्य व केंद्र सरकारलाही पत्र लिहिले आहे. संघटनेनुसार सध्याचे निर्बंध हे अर्धवट स्वरूपातील आहेत. या निर्बंधांमुळे करोना स्थिती फार थोडी नियंत्रणात येत आहे. पण व्यापारीवर्ग व त्यांच्या व्यवसायाचे मात्र भीषण नुकसान होत आहे. हे निर्बंध असेच कायम राहिल्यास करोना पूर्ण नियंत्रणात येण्यास वेळ लागेल. पण त्यादरम्यान व्यावसायिकांचे भीषण नुकसान होईल. त्यातून भविष्यात वेगळ्या समस्या निर्माण होतील. त्यामुळे याऐवजी किमान मुंबई शहर व उपनगरात एकदाच कडक लॉकडाउन लावला जावा. जेणेकरून त्यातून करोना नियंत्रणात येईल व त्यानंतर व्यापारी त्यांचा व्यवसाय सुरळीत करू शकतील.
दीड लाख व्यापाऱ्यांना फटका
मुंबई शहर व उपनगरात जवळपास दीड लाख व्यापारी आहेत. त्यातील अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांचा आकडा जेमतेम १० टक्के आहे. ९० टक्के व्यवसाय ठप्प आहे. त्यातही किरकोळ व्यापारीच अधिक आहेत. त्यातून व्यावसायिकांना विविध प्रकारच्या करांचा भरणा करण्यासह वीज देयके, महापालिकेचे कर, कर्मचाऱ्यांचा पगार आदी सर्व खर्च असतो. त्यामुळेच नुकसान मोठे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
[ad_2]
Source link