Home बातम्या राजकारण पंकजा मुंडे म्हणतात, ‘आम्ही दिलेला शब्द पाळला बरं का.’

पंकजा मुंडे म्हणतात, ‘आम्ही दिलेला शब्द पाळला बरं का.’

मुंबई | मराठा समाजाला दिलेला शब्द आम्ही पाळला. या निर्णयाने समाजाला आता खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे, अशी पहिली प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर काल शिक्कामोर्तब केलं. यावर आता राजकीय नेते आपापल्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

सरकारने मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण देऊ, असा शब्द दिला होता.. तो शब्द आम्ही पाळल्याने आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे तसेच समाधानाचा दिवस आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता सरकारने आरक्षण दिलंय. या आरक्षणाने मराठा समाजाला उन्नती करायची संधी मिळाली आहे, असंही त्या म्हणाल्या.