हायलाइट्स:
- अमरावतीमध्ये एकाच दिवशी ३ ठिकाणी आग
- कोट्यावधीची मालमत्ता जळून खाक
- अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात
या आगीचे लोळ इतके मोठे होते की शेजारी असलेल्या दीपक ट्रेडिंग कंपनीनेही पेट घेतला. जिल्ह्यातील एकाच दिवशी तीन ठिकाणी लागलेली आग विजवण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक झाली. मसान गंज आणि वलगाव क्षेत्रात दोन गोदामांमध्ये मध्यरात्री लागलेली आग लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५० गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. यावेळी आग आटोक्यात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना शर्यतीचे प्रयत्न करावे लागेल.
अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे यांच्या नेतृत्वात जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मात्र, तिन्ही ठिकाणी लागलेल्या आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
अग्नीशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मसान गंज इथल्या मनोज गहिरवार यांचे रिमोल्ड टायरचे गोदाम आहे. या गोदामाला ४ मे रोजी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास आग लागली. त्यात शेकडो टायर जळाले. त्यामुळे आग चांगलीच पसरली. गहिरवार यांनी घटनास्थळी पोहचून तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.