Home मनोरंजन अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून आयपीएस अधिकाऱ्याचा मोठा दावा

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून आयपीएस अधिकाऱ्याचा मोठा दावा

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू अपघात नाही तर त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा केरळमधील आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांनी केला आहे.

केरळमध्ये ऋषिराज सिंह हे त्यांच्या कामामुळे प्रसिद्द आहेत. त्यांनी श्रीदेवींच्या मृत्यूवरून धक्कादायक माहिती दिली आहे.

बाथटबमध्ये बुडून कोणाचाही मृत्यू होऊ शकत नाही. कारण त्या बाथटबमध्ये श्रीदेवी एकदम फिट बसत होत्या, असं सिंह यांनी म्हटलं आहे. श्रीदेवींचे दोन्ही पाय पकडून त्यांचं डोकं पाण्यात घालून त्यांना मारण्यात आलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, ऋषिराज सिंह हे गुन्हेगारी घटना आणि विशेषत: खूनी रहस्य सोडवण्यात ते तरबेज आहेत.