Home ताज्या बातम्या श्रीदेवींची हत्या झाल्याच्या चर्चांवर बोनी कपूर म्हणतात.

श्रीदेवींची हत्या झाल्याच्या चर्चांवर बोनी कपूर म्हणतात.

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचा अपघाती मृत्यू झाला नसून त्यांची हत्या झाल्याचा दावा केरळ मधील आयपीएस ऋषीराज सिंह यानी केला आहे. यावरचं श्रीदेवींचे पती आणि निर्माते बोनी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मला या मुर्खासारख्या गोष्टीवर चर्चा करण्याची इच्छा नाही. अशा चर्चा होत असतात. त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असं बोनी कपूर यांनी म्हटलं आहे.

श्रीदेवींची हत्या झाल्याच्या चर्चा या कोणाच्या तरी कल्पनेला फुंटलेले धुमारे आहेत, असं म्हणत बोनी कपूर यांनी श्रीदेवींची हत्या झाल्याचा दावा फेटाळला आहे.

दरम्यान, श्रीदेवींचा अपघाती मृत्यू झाला आहे, असं बोनी कपूर यांनी म्हटलं आहे.