‘मुंबईत ज्या ठिकाणी पाणी साचते तिथे पंप लावण्यात आले आहेत. भुयारी टाक्या बांधण्याचे कामही वेगाने सुरू आहे. भुयारी टाक्यांमध्ये पाणी साठवले जाईल. समुद्राची भरती ओसरली की, पाणी समुद्रात सोडले जाईल. हिंदमाता येथे सुरू असलेले काम अंतिम टप्यात आहे. या परिसरात दरवर्षीपेक्षा कमी प्रमाणात पाणी साचेल,’ असे काकाणी म्हणाले.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
मेट्रोची ट्रायल रन डी.एन.नगर ते दहिसर या ठिकाणी केली जात आहे. यादृष्टीने आपत्तीच्या वेळी कोणती खबरदारी घेण्यात यावी यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. सुमारे अडीच हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार असून गेल्या दोन दिवसांत ४० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.