[ad_1]
हायलाइट्स:
- आणखी एक ऐतिहासिक चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- प्रसाद ओक करणार ‘भद्रकाली’ चित्रपटाचं दिग्दर्शन
- उलगडणार स्वराज्याच्या अखंडत्वासाठी झटलेल्या एका वीरांगनेची कथा
हो …म्हणून मीच घरातले कॅमेरे बंद केले होते; करणच्या आरोपांवर निशाचा धक्कादायक खुलासा
१८ व्या शतकातील छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडातील मराठा साम्राज्यातील एकमेव महिला सरसेनापती ठरलेल्या ‘श्रीमंत सरसेनापती उमाबाई खंडेराव दाभाडे’ यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘भद्रकाली’ चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. खुल्या मैदानातील युद्ध आपल्या अफाट शौर्याने जिंकणाऱ्या या वीरांगनेचा इतिहास या चित्रपटातून उलगडणार आहे. मैदानावर शौर्य गाजवणाऱ्या उमाबाईंना ‘भद्रकाली’ हे नाव कसं पडलं याची कथा या चित्रपट दिसणार आहे. ही कलाकृती साकारण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज एकत्र काम करणार आहेत.
या चित्रपटाची निर्मिती ब्लॉक बस्टर ठरलेला ‘मुळशी पॅटर्न’ व आगामी ‘जग्गु आणि Juliet’ या चित्रपटांचे निर्माते पुनीत बालन करत आहेत. सुपरहिट चित्रपट ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि आगामी ‘पावनखिंड’ या सिनेमांचे लेखक दिग्पाल लांजेकर हे ‘भद्रकाली’ चे लेखक आहेत. तसेच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या ‘कच्चा लिंबू’ आणि सुपरहिट ‘हिरकणी’ सारख्या चित्रपटांचे तसेच आगामी ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे ‘यशस्वी’ दिग्दर्शक प्रसाद ओक चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत तर संगीतातील जादूगार अजय-अतुल यांच्या उत्कृष्ट गाण्यांची चित्रपटाला साथ असणार आहे. या सगळ्या दिग्गज कलाकारांच्या मेहनतीने तयार होणारा ‘भद्रकाली’ प्रेक्षकांना पुन्हा इतिहासात घेऊन जाणार हे नक्की.
आई- वडिलांना जन्मापूर्वीच झाली होती नकोशी नेहा कक्कर; भावाने सांगितलं कारण
[ad_2]
Source link