Home मनोरंजन …त्यावेळी कपूर कुटुंबियांनी आम्हाला काहीच मदत केली नाही; करिनाचा मोठा खुलासा

…त्यावेळी कपूर कुटुंबियांनी आम्हाला काहीच मदत केली नाही; करिनाचा मोठा खुलासा

0
…त्यावेळी कपूर कुटुंबियांनी आम्हाला काहीच मदत केली नाही; करिनाचा मोठा खुलासा

[ad_1]

मुंबई: अभिनेत्री करिना कपूर खान आणि करिष्मा कपूर यांनी बॉलिवूडमध्ये त्यांची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. चित्रपटांसोबतच त्यांच्या खासगी आयुष्याचाही नेहमीच चर्चा होताना दिसते. करिना आणि करिष्मा बॉलिवूडच्या कपूर घराण्यातल्या लेकी असल्याचं सर्वांनाच माहिती आहे. पण करिनानं एका मुलाखतीत कपूर कुटुंबियांबद्दल एक मोठा खुलासा केला होता त्याच्या आता चर्चा रंगल्या आहेत.

रणधीर आणि बबिता कपूर यांच्या करिना आणि करिष्मा या दोन मुली. पण लग्नानंतर काही वर्षानंतर रणधीर आणि बबिता यांच्यात वाद वाढले आणि त्यांनी एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. करिष्मा आणि करिना बबिता यांच्यासोबत राहू लागल्या. तर रणधीर त्यांच्या आईसोबत राहत होते. या काळात बबिता यांनी करिना आणि करिष्मा यांचा एकटीनं सांभाळ केला. रणधीर किंवा कपूर कुटुंबियांकडून त्यांना कोणतीही आर्थिक मदत करण्यात आली नव्हती, असं करिनानं तिच्या मुलाखतीत म्हटलं आहे.


‘आई सतत काही तरी काम करत राहायची. तिनं एकटीनं आम्हाला वाढवलं. तिनं रिअल इस्टेटचाही बिझनेस केला. तसं पाहायला गेलं तर हा काळ काही सोपा नव्हता. अनेक अडचणी आल्या, पण तिनं सर्व सांभाळलं. म्हणून आज आम्ही यशस्वी आहोत’, असंही बेबो म्हणाली. असं असलं तरी आमच्या वडिलांचं स्थान आमच्या आयुष्यात महत्त्वाचंच आहे. त्या काळात आम्ही बाबांना जास्त भेटायचो नाही. परंतु आता सर्वकाही ठिक सुरू आहे, असंही करिनानं सांगितलं.

विभक्त झाले बबिता आणि रणधीर
६ नोव्हेंबर १९७१ मध्ये रणधीर आणि बबिता यांनी लग्न केलं होतं. लग्नानंतर बबिता यांनी सिनेकरिअर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ८० दशकांत रणधीर यांचे सिनेमे बॉक्सऑफिसवर फ्लॉप होऊ लागले. यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.



[ad_2]

Source link