हायलाइट्स:
- अयोध्येतील कथित जमीन घोटाळ्यावरून वातावरण तापले
- विरोधकांनी भाजप व आरएसएसला घेरले
- भाजपनं चंदा गोळा करण्याचा धंदा चालवल्याचा काँग्रेसचा आरोप
वाचा:‘शिवसेनेनं राम मंदिरासाठी दिलेले एक कोटी परत घ्यावेत’
‘रामाच्या नावावर पैसा वसुलीचा धंदा सुरू असल्याचे आम्ही यापूर्वीही अनेकदा निदर्शनास आणून दिले आहे. परंतु धर्माचे ठेकेदार आपणच असल्याच्या अविर्भावात रामाच्या नावाने खुलेआमपणे पैसे कमावून लोकांच्या श्रद्धेशी खेळ चालवला आहे. बाबा हरिदास यांची मूळ जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांनी दोन कोटी रुपयांना विकत घेतली आणि तीच जमीन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला १८.५ कोटी रुपयात विकण्यात आली. हा व्यवहार फक्त काही मिनिटांत झाला. एवढ्या कमी वेळात एका जमिनीचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे काय वाढू शकतात? या व्यवहारासाठी एवढा मोठा मोबदला देऊन राम मंदिरासाठी पैसे दिलेल्या लोकांचा विश्वासघात केला आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे.
वाचा:अण्णा हजारेंचा वाढदिवस! जितेंद्र आव्हाडांनी ‘अशा’ दिल्या शुभेच्छा
‘मंदिर उभारणीसाठी राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून भाजप व आरएसएसने घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा केले. याद्वारे जनतेला लुबाडले जाण्याची शक्यता आम्ही जानेवारीमध्येच व्यक्त केली होती. संघ परिवाराने राम मंदिरासाठी याअगोरदरही निधी गोळा केला होता. त्याचे काय झाले याची माहिती अद्याप त्यांनी दिलेली नाही. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर मंदिरासाठी जमा केलेले १४०० कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेनंही २०१५ साली हाच आरोप केला होता. त्याशिवाय, काही क्विंटल सोने लुबाडल्याचा आरोपही विश्व हिंदू परिषदेवर झाला होता. त्याचेही उत्तर अद्याप संघ परिवारानं दिलेले नाही. ४ जानेवारी २०२१ रोजी अखिल भारतीय हिंदू महासभेने भाजपच्या निधी संकलन कार्यक्रमाचा विरोध केलेला होता,’ याकडेही सावंत यांनी लक्ष वेधले आहे.
वाचा: गजा मारणे हा सेलिब्रिटी आहे का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
‘अयोध्येत राम मंदिर व्हावे ही सर्वांची इच्छा आहे परंतु रामाच्या नावावर चाललेला हा बाजार लांछनास्पद आहे. अशा घोटाळ्यांवर प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही, हिंदूविरोधी ठरवून आपल्या काळ्या धंद्यावर पांघरून घालण्याचा हा प्रकार आहे. हा प्रकार रामभक्तांचा अपमान करणारा असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी,’ अशी मागणी सावंत यांनी केली आहे.