Home मनोरंजन व्यथा! नीना गुप्तांचं ज्याच्याशी होणार होतं लग्न त्याने अखेरच्या मिनिटाला सोडली साथ

व्यथा! नीना गुप्तांचं ज्याच्याशी होणार होतं लग्न त्याने अखेरच्या मिनिटाला सोडली साथ

0
व्यथा! नीना गुप्तांचं ज्याच्याशी होणार होतं लग्न त्याने अखेरच्या मिनिटाला सोडली साथ

[ad_1]

हायलाइट्स:

  • अभिनेत्री नीना गुप्ता यांचं आत्मचरित्र ‘सच कहूं तो’ प्रकाशित
  • नीना गुप्ता यांनी सांगितली त्याच्या लग्नाची व्यथा
  • अखेरच्या मिनिटाला रद्द झालं होतं नीना गुप्ता यांचं लग्न

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्या बॉलिवूड कारकिर्दिपेक्षा त्यांचं खासगी आयुष्य नेहमीच सर्वाधिक चर्चेत राहिलं. अभिनेत्री करिना कपूरनं नुकतंच नीना गुप्ता यांचं आत्मचरित्र ‘सच कहूं तो‘चं ऑनलाइन प्रकाशन करत त्यांच्यांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. याचा एक व्हिडीओ नीना गुप्ता यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. ज्यात नीना गुप्ता आणि करिना आयुष्यातल्या एकटेपणावर चर्चा करताना दिसत आहेत.

‘लग्नाच्या १३ वर्षांनंतर पहिल्यांदाच पती-पत्नीप्रमाणे वागलो’, नीना गुप्ता यांनी सांगितलं लॉकडाउनचा अनुभव
करिनाशी बोलताना नीना गुप्ता यांनी त्याच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घटनांवर चर्चा केली. जेव्हा त्या मुंबईला आल्या तेव्हा काही लहान-सहान अफेअर्स व्यतरिक्त खरं तर त्यांच्यासोबत कोणीच खंबीरपणे उभं राहिलं नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘जेव्हा मी हे पुस्तक लिहित होते. त्यावेळी मला जाणवलं की, माझ्या आयुष्यातील काही चांगली वर्ष ती होती जेव्हा माझा पती किंवा कोणी बॉयफ्रेंड नव्हता. नंतर मी मुंबईत आले. काही अफेअर्स झाली पण कोणतंच नातं पूर्णत्वास गेलं नाही. एकूण काय तर मी जवळपास एकटीच राहिले.’


नीना पुढे म्हणाल्या, ‘विवियनसोबत माझं नातं काहीसं असंच होतं. ते खूप दूर होते आणि त्यांचं स्वतःचं एक आयुष्य होतं. आम्ही कधी-कधी भेटत असू.’ नीना आणि विवियन यांची एका मुलगी आहे. जी सध्या मसाबा गुप्ता म्हणून फॅशन इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे.

करिनासोबतच्या या संभाषणात नीना यांनी त्या लग्नाच्या आठवणींनाही उजाळा दिला. जे अखेरच्या मिनिटाला रद्द केलं गेलं होतं. त्यावेळी नीना लग्नाच्या शॉपिंगमध्ये बिझी होत्या. नीना सांगितात, ‘मला आजपर्यंत समजलेलं नाही की, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं. पण मी काहीच करु शकत नाही. मी माझ्या आयुष्यात पुढे गेले. पण त्या व्यक्तीशी लग्न झालं असतं तर मला आनंद झाला असता. त्याच्या आई-वडिलांबद्दल खूप आदर आहे. मी त्यांच्या घरी राहत होते. तो आता हे पुस्तक वाचणार आहे, तो जिवंत आहे आणि त्याच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे. त्याची मुलं आहेत.’


नीना सांगतात जेव्हा त्या लोकांना दिर्घकाळ नात्यात असलेलं पाहतात तेव्हा त्याना त्यांचा हेवा वाटतो. त्या म्हणाल्या, ‘लोक म्हणतात की मी माझं आयुष्य माझ्या नियम आणि अटींवर जगते किंवा जगतो. पण माझ्या आयुष्यात असं झालं नाही. जिथेही माझी चुक झाली ती मी मान्य केली आणि पुढे जात राहिले. मला एक सामान्य आयुष्य हवं होतं. जिथे माझा नवरा, मुलं आणि सासू-सासरे असतील. जेव्हा मी दुसऱ्यांना पाहते तेव्हा मला त्यांचा हेवा वाटतो. मी कोणावर आरोप करत नाही किंवा स्वतःला दोष देत नाही. मला दारूचं व्यसन लागलं नाही कारण मला जे हवं होतं ते कधीच मिळालं नाही.’


नीना गुप्ता यांच्या ‘सच कहूं तो’ या पुस्तकात त्याचा नॅशनल स्‍कूल ऑफ ड्रामामधून ८० च्या दशकात मुंबईला येणं आणि एकल पालकत्व पर्यंत प्रवास वाचता येणार आहे. याशिवाय या पुस्तकातून बॉलिवूडमधील पॉलिटिक्स, कास्टिंग काऊच, एक तरुण अभिनेत्री म्हणून कोणीही गॉडफादर नसताना या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहणं किती कठीण असतं याचे अनुभव या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे.



[ad_2]

Source link