Home ताज्या बातम्या Aslam Shaikh: भाजपची अवस्था ‘जल बिन मछली’सारखी; काँग्रेसच्या मंत्र्याकडून शिवसेनेचे समर्थन

Aslam Shaikh: भाजपची अवस्था ‘जल बिन मछली’सारखी; काँग्रेसच्या मंत्र्याकडून शिवसेनेचे समर्थन

0
Aslam Shaikh: भाजपची अवस्था ‘जल बिन मछली’सारखी; काँग्रेसच्या मंत्र्याकडून शिवसेनेचे समर्थन

हायलाइट्स:

  • शिवसेना भवनसमोरील राड्यानंतर आरोप-प्रत्यारोप.
  • मंत्री अस्लम शेख यांनी केले शिवसैनिकांचे समर्थन.
  • भाजपची सध्या ‘जल बिन मछली’सारखी अवस्था.

मुंबई: अयोध्येतील राम मंदिर जन्मभूमीजवळच्या जमिनीच्या वादातून शिवसेना व भाजपमध्ये ठिणगी पडली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईतील दादर येथे शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढल्याने जोरदार सामना पाहायला मिळाला. भाजपच्या मोर्चाला प्रतिकार झाला आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार धुमश्चक्री झडली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला असला तरी आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. यात काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनीही प्रतिक्रिया दिली आहे व भाजपवर निशाणा साधला आहे. ( Aslam Shaikh On Shiv Sena BJP Clash )

वाचा: मुंबईत सेना भवनासमोर राडा! भाजपच्या ‘फटकार’वर शिवसैनिकांचे ‘फटकारे’

‘भाजपची अवस्था सध्या जल बिन मछली’सारखी झाली आहे, असे म्हणत अस्लम शेख यांनी शिवसेना भवन जवळील राड्यावरून टीकास्त्र सोडले. माशाला पाण्याबाहेर काढल्यानंतर तो ज्याप्रकारे तडफडतो तशीच अवस्था आज भाजपची झाली आहे. राज्यातील सत्ता गेल्यानंतर त्यांची जणू शुद्धच हरपली आहे. काय बोलायचं, काय करायचं, कधी कोणती भूमिका घ्यायची, याचे कशाचेच भान भाजपला राहिलेले नाही. त्यातूनच हे सगळे प्रकार सुरू आहेत, अशी तोफ अस्लम शेख यांनी डागली.

वाचा: शिवसेनेने औरंगजेबी वृत्ती दाखवली; आशीष शेलार यांची घणाघाती टीका

भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी जशास तसे उत्तर दिले. त्याचे अस्लम शेख यांनी समर्थन केले. शिवसेना भवनवर हल्ला करण्यासाठी कुणी जाणार असेल तर शिवसैनिक गप्प बसतील का, असा उलट सवाल शेख यांनी केला. शिवसेना भवनवर मोर्चा घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातात ‘सोनिया सेना’ असे फलक होते. त्यावरही शेख यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. भाजपच्या नेत्याने कधी महिलेचा सन्मान केला नाही. त्यांच्या पितृसंघटनेचाही महिलांबाबत तसाच दृष्टीकोन आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना जेवणही जात नाही, हेच सत्य आहे. काँग्रेसशिवाय देश चालणार नाही, हे त्यांनाही चांगले माहीत आहे, असे शेख म्हणाले.

वाचा: काँग्रेस आमदाराची भाई जगतापांविरुद्ध थेट सोनियांकडे तक्रार; कारण…

राज्यात अशांतता निर्माण करण्याचा या सर्वामागे भाजपचा डाव आहे. करोना काळात त्यांचे असेच वर्तन पाहायला मिळाले. मंदिरं सुरू करा, हॉटेलं उघडा, मॉल उघडा, एसटी सुरू करा अशा मागण्या करत भाजपकडून आंदोलने करण्यात आली. जिथे त्यांची सरकारं आहेत तिथे असं काहीच केलं गेलं नाही. फक्त येथे सगळी नाटकं सुरू आहेत. शिवसेना आणि काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच हे सगळं चाललं आहे, असा आरोपही शेख यांनी केला.

वाचा: पंतप्रधानांच्या मनात काय आहे हे कळायला हवं: शाहू महाराज

Source link