हायलाइट्स:
- कंगनाचा पासपोर्ट रिन्यू करण्यास पासपोर्ट ऑफिसनं दिला नकार
- न्यायालयानं पासपोर्टसंबंधी याचिकेची सुनावणी पुढे ढकलल्यावर भडकली कंगना
- पासपोर्टच्या मुद्द्यावरून भडकलेल्या कंगनानं आता आमिर खानवर साधला निशाणा
आपल्या पोस्टमध्ये कंगनानं लिहिलं, ‘महाविनाशकारी सरकारनं पुन्हा मला त्रास देण्यास सुरुवात केली आहे. माझी पासपोर्ट रिन्यूअलची याचिका नाकारण्यात आली आहे. कारण कोणी टपोरी- रोडसाइड रोमियोनं माझ्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल केला आहे. न्यायालयानं माझ्या पासपोर्ट रिन्यूअलच्या याचिका नाकारली आणि ही याचिका अस्पष्ट असल्याचं कारण दिलं आहे.’ ही पोस्ट कंगनानं कू अॅपवर लिहिली होती.
कू अॅपवरील पोस्टवरील हीच पोस्ट कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना कंगानानं लिहिलं, ‘जेव्हा आमिर खान भाजपाच्या विरोधात बोलला होता आणि त्यानं असहिष्णुतेवर वक्तव्य केलं होतं. त्यावेळी कोणी त्याच्या चित्रपटाचं शूटिंग थांबवलं नव्हतं. कोणी त्याच्या पासपोर्टवर बंदी आणली नव्हती. मी फक्त हे सांगत आहे.’
मुंबई उच्च न्यायालयानं कंगनाच्या याचिकेवर सुनावणी करताना तिची याचिका चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. जर पासपोर्टची वैधता संपलेली आहे तर मग अखेरच्या काळात याचिका का दाखल करण्यात आली असा सवाल उच्च न्यायालयानं केला आहे. दरम्यान रिजनल पासपोर्ट ऑफिसनं कंगनाच्या पासपोर्टवर आक्षेप घेत तो रिन्यू करण्यास नकार दिला होता. ज्यानंतर कंगनानं न्यायालयात याचिका दाखल केली होती.