मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध शेती’ या विषयावर कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांची विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दि. 23 जुलै रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणार आहे. तसेच ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर बुधवार दि.24, गुरूवार दि.25 व शुक्रवार दि. 26 जुलै 2019 रोजी सकाळी 7:25 ते 7 :40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
खरीप हंगाम पेरणी, पीक कर्जपुरवठा बाबत माहिती, खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खताबाबत नियोजन, शेतीशाळांचा उपक्रम, कृषी क्षेत्रातील गुंतवणूक तसेच कृषी विभागामार्फत खते, बियाणे, शेतीचं यांत्रिकीकरण, पीक विमा योजना आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.बोंडे यांनी ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.