[ad_1]
रसिक प्रेक्षकांनी मालिकेला आणि त्यातील नलू मावशी, दादा, चिन्या, शकू मावशी, मालविका, रॉकी या पात्रांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडली आहे. प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावलीसारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर होताना दिसत आहे.
परंतु ओम आणि स्वीटूचं हे प्रेम नलूने म्हणजे स्वीटूच्या आईनं अद्यापही स्विकारलं नाहीए. त्यामुळे स्वीटू आणि ओम यांच्यातील जवळीक पाहून ती चिंतेत पडली आहे. नुकत्याच प्रदर्शिक झालेल्या भागात नलू स्वीटूला ओमसोबत फोनवर बोलताना पकडते. आणि तो फोन आगीत टाकून देते. हा सीन पाहून प्रेक्षकांसोबत नेकऱ्यांनीही मालिकेला ट्रोल केलं आहे. यांच्या घरी इतकी गरिबी आहे, आणि हिनं कसलाही विचार न करता फोन आगीट टाकून कसा दिला, असं एकानं म्हटलं आहे. तर नलूने जी ओव्हर अॅंक्टींग केली त्याचे पैसे कापा असं एकानं म्हटलं आहे.
[ad_2]
Source link