[ad_1]
हेही गाजले
निशिकांत कामत (फोर्स, मदारी, दृश्यम), राही अनिल बर्वे (तुंबाड), अभिजित पानसे (ठाकरे), रवि जाधव (बेंजो), मंगेश हाडवळे (मलाल) या दिग्दर्शकांनीदेखील बॉलिवूडमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे.
नवी इनिंग
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘आनंदी गोपाळ’ या सिनेमाचा दिग्दर्शक समीर विद्वांसनं आता नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. समीर आता बॉलिवूड सिनेमांचं दिग्दर्शन करतोय. अभिनेता कार्तिक आर्यनची या सिनेमात मुख्य भूमिका असून ‘सत्यनारायण की कथा’ असं या सिनेमांचं नाव आहे. या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहे. समीरनं यापूर्वी ‘डबल सीट’, ‘टाइम प्लीज’, ‘धुरळा’ आणि ‘आनंदी गोपाळ’ यांसारख्या दर्जेदार मराठी सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. तसंच त्यानं बहुप्रतिक्षित ‘समांतर २’ ही वेब सीरिजदेखील दिग्दर्शित केली आहे. त्यामुळे आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना समीरकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
[ad_2]
Source link