Home ताज्या बातम्या Uddhav Thackeray: मुंबईसाठी हे क्रांतिकारी पाऊल; इस्रायली कंपनीसोबत करार होताच CM म्हणाले…

Uddhav Thackeray: मुंबईसाठी हे क्रांतिकारी पाऊल; इस्रायली कंपनीसोबत करार होताच CM म्हणाले…

0
Uddhav Thackeray: मुंबईसाठी हे क्रांतिकारी पाऊल; इस्रायली कंपनीसोबत करार होताच CM म्हणाले…

हायलाइट्स:

  • मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प २०२५ पर्यंत साकारणार.
  • महापालिकेने इस्रायलमधील कंपनीसोबत केला करार.
  • हे महत्त्वाचेच नाही तर क्रांतीकारी पाऊल: मुख्यमंत्री

मुंबई: मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प सुरू करणे हे महत्त्वाचेच नाही तर क्रांतीकारी पाऊल असून आज आपल्या अनेक वर्षांच्या स्वप्नाला मूर्त रूप येत असल्याचे पाहून आनंद वाटत आहे, असे प्रातिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. ( Uddhav Thackeray On Mumbai Desalination Project )

वाचा: फडणवीसांनी किती शपथा मोडल्या?; खडसेंनी दिले ‘हे’ दोन मोठे दाखले

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहात मुंबई महानगरपालिका व आय.डी. ई. वॉटर टेक्नॉलॉजीज या इस्रायली कंपनीदरम्यान २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, इस्रायलचे महावाणिज्यदूत याकोव फिनकेलस्टाइन, वकालतीमधील अन्य सदस्य, आय.डी.ई. वॉटर टेक्नॉलीजीजचे पदाधिकारी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, एमएमआरडीए आयुक्त एस. श्रीनिवास उपस्थित होते.

वाचा: …तर राजकीय संन्यास घेईन; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुख्यमंत्री म्हणाले की, जगात काही देशांनी यापूर्वी समुद्राचे पाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नि:क्षारीत करून मोठ्याप्रमाणात वापरण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाची एक किंमत असते परंतु त्यापेक्षा माणसाचे आयुष्य अधिक मौल्यवान असून त्यांना पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध करून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे करत असताना किती धरणे बांधायची आणि त्यासाठी किती झाडं तोडून जमिनीचे वाळवंट करायचे याचा विचार करणे आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करणे अगत्याचे आहे. हीच बाब विचारात घेता समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करण्याचा प्रकल्प आता मूर्त रुपाला येत आहे, २०२५ पासून या प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरवठा सुरू होईल. शेवटी विकास करताना या सगळ्या बाबी विचारात घेणे महत्वाचे आहे. हा प्रकल्प मुंबईकरांना नक्की दिलासा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी आज मलाड येथे उभ्या करण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालय तसेच कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या मार्गिकेच्या लोकार्पणातून मुंबईकरांच्या सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती दिली.

वाचा:‘या’ मराठी म्हणीची आठवण देत मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन

नगर विकास विभागाचे पूर्ण सहकार्य

अवेळी पडणारा पाऊस, पाण्याची वाढती मागणी पहाता नि:क्षारीकरण प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार करून आज महापालिकेने महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या प्रकल्पासाठी नगर विकास विभागाचे संपूर्ण सहकार्य राहील असेही त्यांनी सांगितले. राज्याच्या किनारपट्टी भागात समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करण्याचे छोटछोटे प्रकल्प उभे करावेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. आज मालाड येथील २०० दशलक्ष लिटरच्या नि:क्षारीकरण प्रकल्पाच्या डीपीआरसाठी होणारा सामंजस्य करार हे मुंबईकरांसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. भविष्यात ४०० दशलक्ष लिटर क्षमतेपर्यंत याचा विस्तार करता येऊ शकेल, असे त्यांनी नमूद केले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी प्रकल्पाचे स्वरूप, विस्ताराची क्षमता आणि वैशिष्ट्ये आपल्या प्रास्ताविकात मांडली.

वाचा: प्रताप सरनाईक शिवसेनेत राहतील का?; संजय राऊत म्हणाले…

Source link