Home मनोरंजन ‘आपल्याला मुलं असती तर…’ दिलीप कुमार यांच्या मनात अखेरपर्यंत राहिली पिता न झाल्याची खंत

‘आपल्याला मुलं असती तर…’ दिलीप कुमार यांच्या मनात अखेरपर्यंत राहिली पिता न झाल्याची खंत

0
‘आपल्याला मुलं असती तर…’ दिलीप कुमार यांच्या मनात अखेरपर्यंत राहिली पिता न झाल्याची खंत

[ad_1]

हायलाइट्स:

  • दिलीप कुमार यांच्या मनात कायम होती मुल नसल्याची खंत
  • दिलीप कुमार यांना मुलांची होती आवड
  • भावंडांमध्येच दिलीप कुमार यांना दिसायची त्यांची मुलं

मुंबई– बॉलिवूडचे ‘ट्रॅजिडी किंग’ म्हणवले जाणारे लोकप्रिय अभिनेते दिलीप कुमार यांनी आज ७ जुलै रोजी अखेरचा श्वास घेतला. ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दिलीप कुमार यांचं पार्थिव घरी आणण्यात आलं असून सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दिलीप कुमार स्वतःला नशीबवान समजत कारण त्यांना सायरा बानो यांच्यासारखी सहचारिणी लाभली. जीवनातील प्रत्येक सुख- दुःखाच्या क्षणी सायरा दिलीप कुमार यांच्यासोबत सावलीप्रमाणे उभ्या राहिल्या. परंतु, आपण पिता न होऊ शकल्याची खंत दिलीप कुमार यांच्या मनात कुठेतरी कायम होती.

प्रॉपर्टीसाठी दिलीप कुमारांचा भावांशी होता ३६ चा आकडा, मागे ठेवून गेले ६०० कोटींहून जास्तीची संपत्ती

आठव्या महिन्यातच झाला होता दिलीप कुमार यांच्या बाळाचा मृत्यू

दिलीप कुमार यांच्या मनात ही सल कायम राहिली की ते पिता होऊ शकले नाहीत. परंतु, फार कमी लोकांना यामागचं कारण माहीत असेल. दिलीप कुमार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ‘द सबस्टन्स अँड द शॅडो’ या पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख केला आहे. दिलीप कुमार यांच्या पुस्तकामध्ये नमूद केल्याप्रमाणे १९७२ साली सायरा पहिल्यांदा गरोदर राहिल्या होत्या.

दिलीप कुमार- सायरा बानो

परंतु, सायरा यांना असलेल्या हाय ब्लड प्रेशरच्या आजारामुळे आठव्या महिन्यातच त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. याबद्दल दिलीप कुमार यांनी पुस्तकात लिहिलं, ‘आठ महिन्यानंतर आम्ही आमचं बाळ गमावलं. सायराला हाय ब्लड प्रेशर होतं आणि बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टर वेळेवर सर्जरी करू शकले नाहीत. त्यामुळे श्वास कोंडल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला.’

दिलीप कुमार यांच्या सावली होऊन राहिल्या सायरा बानो, ५५ वर्षांनी सुटली साथ

मुलं असती तर चांगलं झालं असतं

मुलाच्या ओढीबद्दल दिलीप कुमार यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं, ‘एक प्रश्न जो मनातून निघत नाही तो म्हणजे मुलं नसल्यामुळे मी आनंदी नाहीये का? मी आनंदी आहे पण मुलं असती तर चांगलं झालं असतं. पण त्यामुळे मी दुःखी नाहीये. अल्लाहने आम्हाला खूप मुलं दिलीयेत. माझ्या तरुणपणाचे सर्व दिवस भाऊ आणि बहिणींसोबत खेळत निघून गेले. ते सगळे शाळेच्या सुट्ट्यांमध्ये मला भेटायला यायचे आणि आम्ही खूप मजा करायचो. ते तर माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपायचे. ते सगळं पालक असल्याची जाणीव करून द्यायला खूप होतं.’

दिलीप कुमार- सायरा बानो

[ad_2]

Source link