Home मनोरंजन दिलीप कुमार- राजकुमार यांच्यात होता ‘Ego War’, सुभाष घईंनी ‘सौदागर’साठी खेळलेली खेळी

दिलीप कुमार- राजकुमार यांच्यात होता ‘Ego War’, सुभाष घईंनी ‘सौदागर’साठी खेळलेली खेळी

0
दिलीप कुमार- राजकुमार यांच्यात होता ‘Ego War’,  सुभाष घईंनी ‘सौदागर’साठी खेळलेली खेळी

[ad_1]

हायलाइट्स:

  • दिलीप कुमार आणि राज कुमार यांच्यात ‘पैगाम’ चित्रपटाच्या सेटवर झाले होते वाद
  • सुभाष घईंनी ३२ वर्षांचे वाद मिटवून दिलीप कुमार आणि राज कुमार यांना आणलं एकत्र
  • दोन्ही कलाकारांना एकत्र आणण्यासाठी सुभाष घईंनी खेळली होती मजेदार खेळी

मुंबई: बॉलिवूडच्या दोन दिग्गज कलाकारांमध्ये वाद किंवा भांडण असणं ही खूपच सामान्य बाब आहे. पण एकेकाळी अभिनेता दिलीप कुमार आणि राज कुमार यांच्यातील वादांची जोरदार चर्चा झाली होती. या दोन्ही कलाकारांमध्ये असं काही घडलं होतं की, त्यांनी ३२ वर्षांपूर्वी एकमेकांसोबत काम न करण्याच्या शपथा घेतल्या होत्या. पण १९९० साली दिग्दर्शक सुभाष घई यांनी या दोघांसोबत अशी खेळी खेळली की दोन्ही अभिनेते एकमेकांसोबत काम करण्यास तयार झाले होते.

Dilip Kumar Live- दिलीप कुमार यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

दिग्दर्शक सुभाष घई बॉलिवूडच्या सर्वोत्तम दिग्दर्शकांमध्ये गणले जातात. सुभाष घईंनी दिलीप कुमार आणि राज कुमार यांच्यातील ३२ वर्षांचा वाद संपवत हे सिद्ध देखील केलं होतं. सुभाष घईंना त्यांच्या ‘सौदागर‘ चित्रपटासाठी दिलीप कुमार आणि राज कुमार यांना साइन करायचं होतं. पण या दोघांना एकत्र आणणं अजिबात सोपं नव्हतं यासाठी घई यांनी एक मजेदार खेळी खेळली.

दिलीप कुमार

दिलीप कुमार आणि राज कुमार यांनी १९५९ साली ‘पैगाम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. पण या चित्रपटातील एका दृश्याच्या चित्रिकरणावेळी राज कुमार यांनी दिलीप कुमार यांच्या जोरदार कानशीलात लगावली होती. त्यानंतर दिलीप कुमार यांनी राज कुमार यांच्यासोबत काम न करण्याची शपथ घेतली होती. सुभाष घई यांनी नेशन नेक्स्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांनी या दोन्ही कलाकरांना एकत्र आणण्यासाठी एक प्लान तयार केला होता. ज्यामुळे या दोन्ही कलाकारांनी ‘सौदागर’ चित्रपटासाठी होकार दिला होता.

PHOTOS: दिलीप कुमार यांच्या अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी

सौदागर सिनेमा

सुभाष घईंनी सांगितलं, ‘जेव्हा मी दिलीप कुमार यांनी चित्रपटाची कथा ऐकवली तेव्हा घरातून बाहेर पडत असताना त्यांनी मला विचारलं की, दुसऱ्या मित्राची भूमिका कोण साकारत आहे. त्यावेळी मी कारचा दरवाजा बंद करता करता त्यांना राज कुमार असं उत्तर दिलं. त्यानंतर मी पुढचे ४-५ दिवस दिलीप कुमार यांना भेटलो नाही. त्यानंतर त्याच संध्याकाळी मी राज कुमार यांच्यासोबत ड्रिंक्ससाठी बसलो होतो आणि त्यांना सौदागरची संकल्पना सांगितली. त्यांनी चित्रपटाला होकार दिला. त्यानंतर त्यांनी विचारलं की, दुसरी भूमिका कोण साकारत आहे. यावर मी आणखी एक खेळी खेळली आणि त्यांना म्हटलं तुमच्यासोबत कोणताही मोठा अभिनेता काम करू शकणार नाही. दिलीप कुमार आहेत ना ते ही दुसरी भूमिका साकारत आहेत.’

दिलीप कुमार

यानंतर सुभाष घाईंनी एकिकडे राजकुमार यांना दिलीप कुमार तुमचे चाहते आहेत असं सांगितलं तर दुसरीकडे दिलीप कुमार यांनी राज कुमार तुमचे चाहते आहेत असं सांगितलं. अशाप्रकारे दोघांचंही कौतुक करत सुभाष घई यांनी या दोन्ही कलाकारांमधील दुरावा संपवला. सुभाष घईंनी केवळ या दोन्ही कलाकारांना आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी तयारच केलं नाही तर पुढच्या ११ महिन्यात त्यांनी या चित्रपटाचं चित्रकरण देखील पूर्ण केलं. ‘सौदागर’ ९ ऑगस्ट १९९१ रोजी रिलीज झाला आणि या चित्रपटानंतर दोन्ही कलाकार एकमेकांचे चांगले मित्रही झाले.

[ad_2]

Source link