[ad_1]
हायलाइट्स:
- अमिताभ आणि इम्रानप्रमाणे रियाच्या भूमिकेकडून अपेक्षा नाहीत
- दिग्दर्शकांनी केला रियाच्या भूमिकेबद्दल खुलासा
- सुशांत मृत्यू प्रकरणाचा रियाच्या भूमिकेवर परिणाम नाही
अगदीच सुकून गेली की गं… असं म्हणत अभिज्ञा भावेची या अभिनेत्यानं केली मस्करी
‘चेहरे’ चित्रपटाचे दिग्दर्शक रूमी जाफरी यांनी चित्रपटाबद्दल खुलासा करत रियाच्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडणार असल्याचं म्हटलं आहे. ‘चेहरे’ चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. शिवाय, सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रियाचा हा पहिला चित्रपट असणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. परंतु, रूमी यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटातील रियाच्या भूमिकेकडून फार अपेक्षा ठेवणं प्रेक्षकांची चूक ठरेल. त्याने प्रेक्षक निराश होतील. रूमी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं, ”चेहरे’ चित्रपटातील रियाची भूमिका फार छोटी आहे. जे प्रेक्षक रियाला पाहण्यासाठी जात आहेत त्यांना सांगतो की, हा चित्रपट पूर्णपणे अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांच्यावर केंद्रित आहे. या दोन कलाकारांची जुगलबंदी तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळणार आहे.’
रूमी यांनी प्रेक्षकांना रियाच्या भूमिकेकडून फार अपेक्षा न ठेवण्याचं आवाहन केलं. ‘चेहरे’ चित्रपटात अमिताभ आणि इम्रानसोबत अनु कपूर, क्रिस्टल डिसूजादेखील दिसणार आहेत. रूमी यांनी यापूर्वी चित्रपटाबद्दल केलेल्या खुलाशात म्हटलं होतं की, सुशांत प्रकरणानंतर चित्रपटातील रियाच्या भूमिकेवर कोणताही परिणाम झालेला नाही. सोबतच त्यांनी रियाचं कौतुक करत तिने चित्रपटात उत्कृष्ट काम केल्याचं म्हटलं होतं.
सुनील बर्वेंच्या लेकीच्या लग्नातील व्हिडीओ पाहून व्हाल भावुक
[ad_2]
Source link