हायलाइट्स:
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला.
- उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी काम करण्याचे दिले आदेश.
- १२ जुलै ते २४ जुलै या काळात शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी
शिवसेनेच्या राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. या वेळी खासदार अनिल देसाई हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर खासदार अनिल देसाई यांनी या बैठकीबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. या बैठकीत गावागावात शिवसंपर्क अभियान सुरू करा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांनी दिले. हे शिवसंपर्क अभियान १२ जुलै ते २४ जुलै या काळात राबवण्यात येणार आहे. तसेच जनतेची कामे करा, आपला पक्ष बळकट करा, असे आदेशही ठाकरे यांनी दिल्याचे देसाई यांनी सांगितले.
सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचतायत की नाही?
यात विधानसभानिहाय, तालुकानिहाय आणि पंचायचनिहाय कामे करणे अपेक्षित आह. अधिकाधिक गावांमध्ये पोहोचत लोकांशी संपर्क वाढवण्यावर या अभियानात भर दिला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार ज्या योजना रावबत आहे, त्या योजना लोकांपर्यंत पोहोत आहेत का, याची खातरजमा करा असा आदेशही ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा- पक्षाच्या कार्यक्रमांपासून तीन महिने दूर राहणार; प्रकाश आंबेडकर यांची घोषणा
प्रत्येक शिवसैनिकाच्या मागे पक्ष खंबीरपणे उभा आहे. तुम्ही फक्त कामे करा. शिवसेना पक्ष ही आपली जबाबदारी आहे. सन १९६६ पासून ते आतापर्यंत आपण इथपर्यंत कशा प्रकारे आलो हे जाणून घ्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घराघरात कसा पोहोचेल या उद्देशाने काम करा, असे ठाकरे म्हणाले. निवडणुका येतील आणि जातील, मात्र लोकांचा विश्वास संपादन करणे महत्वाचे असल्याचे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- जळगावात महामार्गावर भरधाव कारला अपघात; मुंबईचे दोन तरुण ठार
क्लिक करा आणि वाचा- गेल्या सहा महिन्यांत किती बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या?; नवाब मलिक म्हणतात…