Home मनोरंजन ‘देवदास’ चित्रपटाच्या सेटवर वारंवार घडणाऱ्या एका घटनेने वैतागलेला शाहरुख खान, म्हणाला…

‘देवदास’ चित्रपटाच्या सेटवर वारंवार घडणाऱ्या एका घटनेने वैतागलेला शाहरुख खान, म्हणाला…

0
‘देवदास’ चित्रपटाच्या सेटवर वारंवार घडणाऱ्या एका घटनेने वैतागलेला शाहरुख खान, म्हणाला…

[ad_1]

हायलाइट्स:

  • ‘देवदास’ चित्रपटाला पूर्ण झाली १९ वर्ष
  • शाहरुख खानने फोटो शेअर करत सांगितली अडचण
  • सेटवरील एका घटनेने वैतागला होता शाहरुख

मुंबई– ‘देवदास‘ हिंदी चित्रपटसृष्टीमधील अत्यंत महत्वाचा चित्रपट मानला जातो. प्रदर्शनाच्या १९ वर्षांनंतरही ‘देवदास’ चित्रपटाची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. चित्रपटाचं उत्तम दिग्दर्शन, मोठमोठाले सेट, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय आणि जबरदस्त कथा यामुळे चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली होती. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा शाहरुख खान मात्र चित्रपटाच्या सेटवर घडणाऱ्या एका घटनेने प्रचंड वैतागला होता. चित्रपटाला १९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाहरुखने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्या घटनेचा खुलासा केला आहे.

‘अंतवर्स्त्र घातली का?’ प्रश्न विचारण्याआधी हेमांगीची पोस्ट वाचा

शाहरुखने ‘देवदास’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यासोबत शाहरुखने कॅप्शनमध्ये त्याला सामोरं जावं लागणाऱ्या त्रासाबद्दल लिहिलं आहे. चित्रपटाच्या टीमचे आभार मानत शाहरुखने लिहिलं, ‘ते रात्री उशिरापर्यंतचं जागणं आणि पहाटे लवकर उठणं… खूप कठीण वेळ आणि संकटं. सगळं काही खूप छान पद्धतीने पार पडू शकलं कारण तिथे माझ्यासोबत सुंदर अशी माधुरी दीक्षित होती. उत्कृष्ट ऐश्वर्या राय, नेहमीच उत्साहाने भरलेले जॅकी श्रॉफ, आयुष्याचा अर्थ सांगणाऱ्या किरण खेर आणि या सगळ्यांना सांभाळणारे उत्कृष्ट आणि संयमी संजय लीला भन्साळी तिथे होते. पण एकच मोठी अडचण होती ती म्हणजे, माझं धोतर वारंवार खाली पडत होतं. तुमच्या प्रेमासाठी खूप धन्यवाद.’


आपल्या पोस्टमधून शाहरुखने त्याच्या समस्येचा उलगडा केला आहे. यापूर्वीही अनेक मुलाखतींमध्ये शाहरुखने त्याच्या धोतर खाली पडण्याच्या अडचणीचा खुलासा केला होता. शाहरुखने म्हटलं, ‘मला संपूर्ण चित्रपटात धोतर नेसायचं होतं आणि माझ्या धोतराची गाठ वारंवार सुटत होती. त्यामुळे चांगलं सुरू असलेलं चित्रीकरणसुद्धा थांबवावं लागायचं. मला या गोष्टीचा फार राग यायचा. सोबत मी या गोष्टीला वैतागलो होतो.’ ‘देवदास’ ला १९ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने अभिनेत्री माधुरी दीक्षितने देखील काही फोटो पोस्ट करत दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

‘सत्यमेव जयते’ मोठमोठ्या गोष्टी सांगतो, खऱ्या आयुष्यात मात्र… लडाखमधील गावकऱ्यांची आमिरवर टीका



[ad_2]

Source link