हायलाइट्स:
- बॉलिवूडमध्ये मिळाल्या नाहीत खलनायकाच्या भूमिका
- बॉलिवूडमध्ये कायम झाला पंचिंग बॅग प्रमाणे वापर
- रजा मुराद यांच्या एका अफवेमुळे झालं शरत यांचं नुकसान
अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर BMC आधी मनसेने चिकटवलं पोस्टर
बॉलिवूडमध्ये कधीही मिळालं नाही खलनायकाचं पात्र
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल सांगताना शरत म्हणाले, ‘मी नेहमीच एक भरदार शरीरयष्टी असणारा व्यक्ती होतो. त्यामुळे मला चित्रपटात मारामारी करणारी पात्र मिळायची. मी स्क्रीनवर खूप मारामाऱ्या करायचो पण मला कधीही मुख्य खलनायकाचं पात्र मिळालं नाही. मला तो सन्मान मिळाला नाही ज्यासाठी मी पात्र होतो. मला नेहमीच खलनायकाच्या हाताखालच्या माणसाचं काम मिळालं. हिरो यायचा आणि मला मारून निघून जायचा. बॉलिवूडसाठी मी फक्त एक पंचिंग बॅग होतो.’
रजा मुराद यांच्या अफवेमुळे झालं कामाचं नुकसान
रजा मुराद यांच्याबद्दल सांगताना शरत म्हणाले, ‘बॉलिवूडमध्ये मुख्य पात्र मिळत नसल्याने मी दाक्षिणात्य चित्रपटात काम करू लागलो. तिथे मला खलनायकाच्या भूमिका मिळू लागल्या. एके दिवशी मला माहीत झालं की आमिर खानने ‘गुलाम’ चित्रपटासाठी माझं नाव सुचवलं होतं. परंतु, एका व्यक्तीने मी बॉलिवूड सोडून चैन्नईला शिफ्ट झाल्याची अफवा पसरवली होती त्यामुळे मला त्या भूमिकेसाठी विचारणा देखील झाली नाही. ती व्यक्ती होती रजा मुराद. त्यांच्या अफवेमुळे सगळ्यांना वाटत होतं की मी बॉलिवूडमध्ये काम करणं सोडलं आहे. त्यामुळे माझ्या कामाचं फार नुकसान झालं.’