हायलाइट्स:
- पक्ष सोडणाऱ्यांबद्दल राहुल गांधींची भूमिका रास्तच.
- काँग्रेससाठी निष्ठेने काम करणारे असंख्य कार्यकर्ते.
- प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी दाखवली निष्ठा.
वाचा: PM मोदी-शरद पवार भेटीमागे दडलंय काय?; राष्ट्रवादीने केले स्पष्ट
नसीम खान पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना व अनुभवी राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसचा विचार हाच देशाला तारणारा विचार असून सर्व जाती, धर्माच्या लोकांचा काँग्रेसमध्ये सन्मान राखला जातो. राहुल गांधी यांची लढाई ही फॅसिस्ट विचारांच्या लोकांशी आहे. ही लढाई लढण्यासाठी राहुल गांधी यांच्या पाठिशी आपण सर्वांनी भक्कपणे उभे राहिले पाहिजे. जे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे आणि भीत्रे, घाबरट आहेत असे लोक राहुल गांधी व काँग्रेसची लढाई लढू शकणार नाहीत. म्हणून राहुल यांनी घेतलेली भूमिका एकदम रास्त असून काँग्रेस विचारांवर ज्यांची श्रद्धा आहे अशा सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्ष व राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
वाचा: शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, फडणवीसही दिल्लीत
केंद्रात भाजप सरकार आल्यापासून विरोधी पक्षांच्या लोकांना ईडी, सीबीआय सारख्या संस्थांच्या माध्यमातून भीती दाखवली जात आहे. या दबावाला बळी पडून, घाबरूनच काँग्रेस पक्षातील काही लोकांनी बाहेरचा रस्ता धरला आहे. काँग्रेस पक्षाने अशा लोकांना विविध पदे देऊन त्यांचा सन्मान केला पण पक्षाला गरज असताना मात्र ते घाबरून पळून जात आहेत. असे लोक पक्षातून गेले तरी न घाबरता काँग्रेस पक्षासाठी काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. राहुल गांधी यांच्या बरोबरीने हेच कार्यकर्ते फॅसिस्ट विचारांविरोधात लढा देतील, असेही नसीम खान म्हणाले.
वाचा: शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमला दणका; सरकारने दिली ‘ही’ परवानगी