हायलाइट्स:
- शरद पवारांनी घेतली नरेंद्र मोदी यांची भेट
- राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण
- नवाब मलिक यांनी स्पष्ट केली भूमिका
या भेटीच्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नदीच्या दोन टोकांप्रमाणे आहेत. जोपर्यंत नदीमध्ये पाणी असतं, तोपर्यंत नदीची दोन टोकं कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. भाजप व राष्ट्रवादीचंही तसंच आहे. राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा पूर्णपणे वेगळी आहे राष्ट्रवादीचा राष्ट्रवाद आणि भाजपचा राष्ट्रवाद यांच्यात जमीन आस्मानाचं अंतर आहे. असं असताना हे दोन्ही पक्ष एकत्र येणं शक्य नाही. त्यामुळं याबाबतच्या चर्चांमध्ये तथ्य नाही,’ असं मलिक यांनी स्पष्ट केलं.
‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर स्थापन करण्यात आलेलं आहे. ते व्यवस्थित काम करत आहे. असं असताना काही लोक ‘तारीख पे तारीख’ देत मी पुन्हा येईन सांगत आहेत. हवामान खात्याने अंदाज दिल्यावर पाऊस येतो, मात्र यांचा अंदाज खरा ठरत नाही,’ असा टोलाही नवाब मलिक यांनी यावेळी लगावला.
वाचा: त्या बारमालकांना अद्याप अटक का नाही?; काँग्रेसचा ईडीला सवाल
केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते व मंत्र्यांची सध्या चौकशी सुरू आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मालमत्ताही ईडीनं जप्त केली आहे. तसंच, काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद असलेल्या सहकार क्षेत्राकडंही भाजपनं मोर्चा वळवला आहे. त्यासाठी केंद्रात सहकार हे स्वतंत्र खातं निर्माण करण्यात आलं आहे. त्या माध्यमातून या दोन्ही पक्षांना चाप लावण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. पवार व मोदी यांच्या आजच्या भेटीकडं या कोनातूनही पाहिलं जात आहे.
वाचा: …म्हणून मी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला: आदित्य शिरोडकर