Home ताज्या बातम्या Uddhav Thackeray: ‘महाराष्ट्र शोकाकुल आहे; कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नका’

Uddhav Thackeray: ‘महाराष्ट्र शोकाकुल आहे; कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नका’

0
Uddhav Thackeray: ‘महाराष्ट्र शोकाकुल आहे; कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नका’

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्री यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत.
  • पुराचे संकट, करोना पार्श्वभूमीवर घेतला निर्णय.
  • मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे आवाहन.

मुंबई:कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला आहे. पुरामुळे अनेक मृत्यू झाले आहेत तर अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ( Uddhav Thackeray Birthday Latest Update )

वाचा: खेडमध्ये दरडीखाली आढळले ८ मृतदेह; ९ गावकरी अजूनही बेपत्ता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी असला तरी राज्यातील या आपत्तींमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त कुणीही अभिष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मीडिया व ई-मेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान द्या

राज्यात अद्याप करोनाचे संकट कायम आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे. म्हणून वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पूर आणि करोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पडावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

वाचा: ‘त्या’ माऊलीला हुंदका आवरत नव्हता; हात जोडत मुख्यमंत्री म्हणाले…

मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना दिला धीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. महापुराने कोकणात हाहाकार उडवला असून रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. महाडमधील तळिये गावात दरड कोसळून अनेक घरे गाडली गेली आहेत. आतापर्यंत ४७ जणांचे मृतदेह आढळले असून २३ जण अद्याप बेपत्ता आहेत. ही भीषण स्थिती लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी शनिवारी थेट तळिये गावात घटनास्थळी जात स्थितीचा आढावा घेतला व मृतांच्या नातेवाईकांना धीर दिला. त्यानंतर मुख्यमंत्री आज चिपळूणमध्ये दाखल झाले आहेत. चिपळूण बाजारपेठेत मुख्यमंत्र्यांनी स्थितीचा आढावा घेतला व नागरिक तसेच व्यापाऱ्यांना त्यांनी भरीव मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकही घेतली.

वाचा: ‘सवंग लोकप्रियतेसाठी मी आत्ता लगेचच कोणतीही घोषणा करणार नाही’

Source link