Home मनोरंजन आई होणं एवढ्यातच स्त्रीचं स्त्रीत्व आहे का? ‘आई कुठे काय करते’ मालिकेची पडद्यामागची खास गोष्ट

आई होणं एवढ्यातच स्त्रीचं स्त्रीत्व आहे का? ‘आई कुठे काय करते’ मालिकेची पडद्यामागची खास गोष्ट

0
आई होणं एवढ्यातच स्त्रीचं स्त्रीत्व आहे का?  ‘आई कुठे काय करते’ मालिकेची पडद्यामागची खास गोष्ट

[ad_1]

सुरज कांबळे

मुंबई: मालिकांमधून अनेकदा सामाजिक विषयांवर भाष्य करत समाजप्रबोधनाचा प्रयत्न केला जातो. ‘आई कुठे काय करते‘ या मालिकेतही संवेदनशील विषय मांडला गेला. ‘आई होणं एवढ्यातच स्त्रीचं स्त्रीत्व आहे का’ या विषयावर भाष्य करणारे तीन भाग नुकतेच होऊन गेले. मालिकेत गौरी आणि यशच्या साखरपुड्याचा हा प्रसंग १७ कलाकारांच्या उपस्थितीत तीन दिवस चित्रित केला गेला.

३१ पानांची संहिता असलेला हा प्रसंग उत्तमरित्या सादर केल्यामुळे मालिकेचं कौतुक होतंय. या प्रसंगातले प्रत्येक कलाकाराच्या तोंडी असलेले संवाद चर्चिले गेले. याबद्दल संवाद लेखिका मुग्धा गोडबोले हिनं सांगितलं, ‘१७ व्यक्तिरेखांना घेऊन एकाच ठिकाणी एकाच प्रसंगाचं चित्रीकरण करायचं हे आव्हान होतं. प्रत्येक पात्राचं म्हणणं, त्यांची बाजू मांडणं हे सगळं त्यात आवश्यक होतं. प्रत्येक पिढीची एक विचारसरणी आहे. ती मांडतांना सगळ्यांना सामावून घ्यावं लागतं. अनेक वर्षांचा अनुभव, ऐकलेल्या गोष्टी, वाचन या सगळ्यांमुळे मला त्या प्रसंगाचे संवाद लिहिता आले.’ सतत काहीतरी नवीन देण्याच्या स्पर्धेत महत्त्वाच्या विषयावर पटकथा लिहिल्यामुळे मालिकेचं कौतुक होतंय. याविषयी पटकथा लेखिका नमिता वर्तकनं सांगितलं की, ‘मालिकेत असे विषय फारसे हाताळले जात नाहीत. आमचे निर्माते राजन शाही यांनी मात्र त्यासाठी होकार दिला.

अनेक वर्षांची विचारसरणी आणि त्यातील गंभीर प्रश्न आजही दुर्लक्षित आहेत. आई होणं, न होणं आणि स्त्रीत्व यावर आजही ठामपणे मत मांडलं जात नाही. हा प्रश्न मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आज त्याची चर्चा होतेय याचा मला आनंद आहे.’ एखादा प्रसंग चित्रित होण्याआधी मालिकेची तांत्रिक टीम सर्व बाबी तपासून घेत असते. या मालिकेचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांनीदेखील काही गोष्टींचा अभ्यास केला. ‘हा प्रसंग ३१ पानांचा होता. संवेदनशील विषय प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यासाठी मी अर्धा दिवस संहितेचं फक्त वाचन केलं. पहिल्या दिवशी मास्टर सीन म्हणजे सगळे कलाकार एका फ्रेममध्ये दिसतील असं चित्रीकरण केलं. दुसऱ्या दिवशी क्लोज सीन आणि तिसऱ्या दिवशी कलाकारांच्या प्रतिक्रिया अशी कामाची विभागणी केली. नेमकी कोणती प्रतिक्रिया घ्यावी, कोणता टेक योग्य या सगळ्याची मेहनत संकलक हेमंत तळवडेकरनं घेतली.

प्रत्येक कलाकाराचा मेकअप, कपडे तिन्ही दिवस सारखेच असल्यामुळे मेकअप दादांसह कलाकारही सूचना देत होते’, असं रवींद्र यांनी सांगितलं. टीम वर्क असल्यामुळेच महत्त्वाच्या विषयांचे उत्तम सादरीकरण शक्य होत असल्याचंही ते म्हणाले.

[ad_2]

Source link