Home ताज्या बातम्या Ashadhi Ekadashi: आषाढीनिमित्त अजितदादांचं विठ्ठलाला ‘हे’ साकडं; करोना संपेल आणि…

Ashadhi Ekadashi: आषाढीनिमित्त अजितदादांचं विठ्ठलाला ‘हे’ साकडं; करोना संपेल आणि…

0
Ashadhi Ekadashi: आषाढीनिमित्त अजितदादांचं विठ्ठलाला ‘हे’ साकडं; करोना संपेल आणि…

हायलाइट्स:

  • आषाढी निमित्त अजित पवार यांच्याकडून साकडं.
  • बा पांडुरंगा, जगावरचं करोनाचं संकट दूर कर.
  • वारकरी बांधव, नागरिकांनाही दिल्या शुभेच्छा.

मुंबई:आषाढी एकादशी निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरचा बा पांडुरंग आणि माता रुक्मिणी चरणी वंदन केलं असून समस्त वारकरी बांधवांना, राज्यातील नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ( Ajit Pawars Prayer To Vitthal Rukmini )

वाचा: तुफान पावसात मुख्यमंत्री सपत्निक पंढरपूरला रवाना, स्वत: चालवतायत गाडी

“यंदा राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊदे. माझ्या राज्यातला बळीराजा सुखी होऊदे. त्याच्या शेतशिवारात, घराघरात धनधान्याची, दूधदुभत्याची समृद्धी येऊदे. बा पांडुरंगा, जगावर आलेलं करोना महामारीचं संकट लवकर दूर कर. सर्वांना निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी ठेव”, असं साकडं यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांनी बा पांडुरंग आणि माता रुक्मिणी चरणी घातलं आहे.

वाचा: ‘आता वारकऱ्यांना घरी बसवून मुख्यमंत्री फोटोत झळकताहेत’

आषाढी एकादशी निमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राची संत परंपरा, पांडुरंगभक्तीचा वसा आणि वारसा पुढे नेणाऱ्या तमाम वारकरी माऊलींनाही वंदन केलं आहे. समाजातले सगळे भेदाभेद नष्ट करून, बा पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं, सर्वांना एकत्र, समानतेच्या पातळीवर आणणारी पांडुरंग भक्तीची, पंढरपूर वारीची परंपरा आपलं आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभव आहे. हे वैभव सांभाळून पुढच्या पिढीकडे द्यायचं आहे. बा पांडुरंगाच्या कृपेनं करोनाचं संकट लवकरच संपेल आणि आपण सर्वजण वारीनं पंढरपूरला जाऊ शकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

वाचा:ठाणे: कळव्यात दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जण ठार, दोन जखमी

दरम्यान, गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही करोनाच्या सावटाखाली आषाढी यात्रा होत असून केवळ मानाच्या पालख्यासह ४०० वारकऱ्यांनाच पंढरीत जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी पायी वारीस मनाई करण्यात आली आहे. पंढरपुरात आषाढीला गर्दी होऊ नये म्हणून निर्बंध लादण्यात आले असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपुरात आणि पंढरपूरच्या वेशीवर पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला आहे.

वाचा: ‘महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात!’

Source link