Home शहरे मुंबई ashish shelar vs nawab malik: … तर मग अजित पवारांचा राजीनामा घेणार का?; आशीष शेलारांचे प्रत्युत्तर

ashish shelar vs nawab malik: … तर मग अजित पवारांचा राजीनामा घेणार का?; आशीष शेलारांचे प्रत्युत्तर

0
ashish shelar vs nawab malik: … तर मग अजित पवारांचा राजीनामा घेणार का?; आशीष शेलारांचे प्रत्युत्तर

[ad_1]

हायलाइट्स:

  • पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करणारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना भाजप नेते आशीष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
  • ज्या प्रमाणे मलिक यांनी ज्या प्रमाणे बंगालची जबाबदारी घेऊन शहांचा राजीनामा मागितला, त्या प्रमाणे ते पंढरपूरची जबाबदारी घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घेणार का? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.
  • नवाब मलिक हे अर्धवट माहितीच्या आधारावर पत्रकार परिषद घेतात. मोफत लसीच्या मुद्द्यावर ते तोंडघशी पडले आहेत- आशीष शेलार.

मुंबई: पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करणारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना भाजप नेते आशीष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्या प्रमाणे मलिक यांनी ज्या प्रमाणे बंगालची जबाबदारी घेऊन शहांचा राजीनामा मागितला, त्या प्रमाणे ते पंढरपूरची जबाबदारी घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घेणार का? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. (ashish shelar replied nawab malik saying will you take resignation of ajit pawar)

आशिष शेलार पत्रकार परिषदेत बोलत होते. नवाब मलिक हे अर्धवट माहितीच्या आधारावर पत्रकार परिषद घेतात. मोफत लसीच्या मुद्द्यावर ते तोंडघशी पडले आहेत. खोटी माहिती त्यांनी देऊ नये, असे शेलार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर मग पंढरपूरमध्ये त्यांच्या पक्षाला अपयश मिळाल्यानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजिनामा मागणार का?, या पराभवाची जबाबदारी स्विकारून स्वत: नवाब मलिक राजीनामा देणार का? असे एकावर एक सवाल शेलार यांनी विचारले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- मुंबईतून कधी हद्दपार होणार करोनाची दुसरी लाट? अभ्यासातून नवी तारीख समोर

‘स्वत:चे ठेवायचे झाकून आणि…’

आम्ही ममता दीदींना पराभूत करू शकलो नाही हे खरं आहे. पश्चिम बंगालमध्ये आम्हाला पूर्ण विजय मिळाला नाही. आम्हाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी देखील यशाचे मोजमाप फक्त भाजपकडेच आहे, असेही शेलार म्हणाले. जितेंद्र आव्हाड जर अदृश्य शक्तींबद्दल बोलले असतील तर त्यांची काळजी काँग्रेसने केली पाहिजे. या अदृश्य हातांनी काँग्रेस भूईसपाट झाली. पंढरपूरात मग काय झाले?, असा सवाल करतानाच यालाच म्हणतात स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याकडे बघायचे वाकून, असा चिमटा शेलारांनी काढला.

क्लिक करा आणि वाचा- चंद्रकांत पाटलांनी माझा कोणता पुतण्या शोधून काढला?: छगन भुजबळ

यावेळी शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. जे स्वतः कुबड्यांवर आहेत आणि ज्यांचे पाहिले पाऊलच कुबड्यांशिवाय पडत नाही, त्यांची बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची औकातच नाही, असा टोलाही त्यांनी राऊत यांना लगावला.

पटोलेंवरही सोडले जोरदार टीकास्त्र

काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटोले यांच्यावरही आशीष शेलार यांनी टीका केली आहे. माहितीविना बोलणे म्हणजे कालाकांडी. नाना पटोले यांचे आयुष्यच कालाकांडीच्या कामात गेल्याचे ते म्हणाले. पटोले व्यवहाराच्या सत्यतेवर माहिती ठेवत नाहीत. उचलली जीभ की लावली टाळ्याला असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही, असे पटोले म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- बारामतीत ५ मे पासून ७ दिवस कडक लॉकडाऊन; अजित पवार यांनी निर्देश देताच…

[ad_2]

Source link