Home ताज्या बातम्या Chandrakant Patil: म्हणून सरकार पाच वर्षे टिकेल असे ते वारंवार सांगतात!; पाटलांची फटकेबाजी

Chandrakant Patil: म्हणून सरकार पाच वर्षे टिकेल असे ते वारंवार सांगतात!; पाटलांची फटकेबाजी

0
Chandrakant Patil: म्हणून सरकार पाच वर्षे टिकेल असे ते वारंवार सांगतात!; पाटलांची फटकेबाजी

हायलाइट्स:

  • महाविकास आघाडीला सामान्यांशी देणेघेणे नाही.
  • भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका.
  • विरोधी पक्षाची भूमिका आम्ही प्रभावीपणे बजावली.

मुंबई: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला सामान्य लोकांची चिंता नाही. सत्ता किती काळ टिकेल याचा भरवसा वाटत नसल्याने सगळा भर कमाई करण्यावर आहे आणि राज्यात भ्रष्टाचाराने टोक गाठले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ( Chandrakant Patil Targets Maha Vikas Aghadi Government )

वाचा: OBC आरक्षणावरून खडसेंच्या घरात खटके; नणंद-भावजय आमनेसामने

भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या राज्यव्यापी बैठकीसाठी विविध जिल्ह्यातून पक्षाचे पदाधिकारी ऑनलाईन जोडले गेले होते. मुंबईत व्यासपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना त्यांचे सरकार किती टिकेल याची खात्री वाटत नाही, त्यामुळे ते वारंवार सरकार पाच वर्षे टिकेल म्हणून सांगतात. परंतु, सत्ता उद्या जाईल तर आज कमाई करून घ्या, असे या आघाडीच्या नेत्यांचे धोरण आहे. त्यांना सामान्य लोकांशी काही देणेघेणे नाही. आघाडी जनतेसाठी निर्णय करत नसल्याने मराठा आरक्षण गेले तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. महाविकास आघाडीचे नेते कोडगेपणाने केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत आहेत. या आघाडीने भ्रष्टाचाराचे टोक गाठले आहे, तसेच खोटारडेपणाचेही टोक गाठले आहे.

वाचा: धोका पत्करू नका!; निर्बंधांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांचे महत्त्वाचे निर्देश

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वारंवार जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने करून या सरकारवर अंकूश ठेवला आहे. भाजपाने विरोधी पक्षाची भूमिका प्रभावीपणे बजावली आहे. भाजपाच्या दबावामुळे दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. शेतकरी, वीज ग्राहक, मराठा समाज, ओबीसी, वंचित घटक अशा विविध घटकांसाठी भाजपाने आंदोलने केली आहेत. भाजपाने महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडले नसते तर त्यांना राज्यात स्वैराचार करण्यास खुले रान मिळाले असते, असेही पाटील म्हणाले. सेवा हा भाजपाचा स्थायीभाव आहे. करोनाच्या महासाथीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून अभिमानास्पद सेवाकार्य केले आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तज्ञांच्या सूचनेनुसार तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

वाचा: सांगली पालिका हद्दीत अचानक रुग्णवाढ; जिल्हाधिकारी उचलणार कठोर पाऊल

Source link