Home बातम्या आंतरराष्ट्रीय Coronavirus Crisis ‘भारतात करोनामुळे गंभीर परिस्थिती; लष्कराची मदत घ्यावी’

Coronavirus Crisis ‘भारतात करोनामुळे गंभीर परिस्थिती; लष्कराची मदत घ्यावी’

0
Coronavirus Crisis ‘भारतात करोनामुळे गंभीर परिस्थिती; लष्कराची मदत घ्यावी’

[ad_1]

वॉशिंग्टन: भारतात करोनाच्या संसर्गामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि संसर्ग रोग तज्ज्ञ डॉ. अँथोनी फाउची यांनी म्हटले आहे. भारताने करोनाच्या साखळीला तोडण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन लागू करण्यासह लसीकरण मोहिमेला वेग दिला पाहिजे. त्याशिवाय अनेक ठिकाणी तात्पुरती रुग्णालये उभारावी आणि लष्कराची मदत घ्यावी असे फाउची यांनी म्हटले.

भारताने करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लष्कराची मदत घेण्याचे वक्तव्य डॉ. फाउची यांनी केले. त्यासाठी त्यांनी चीनचे उदाहरण दिले. मागील वर्षी चीनमध्ये करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावला होता. त्यावेळी चीनने वेगाने नवीन रुग्णालये बांधण्याकडे लक्ष दिले होते. जेणेकरून अधिकाधिक लोकांना रुग्णालयात उपचार घेता येतील.

वाचा:करोनाच्या ब्राझील, ब्रिटीश आणि भारतीय वेरिएंटवर ‘ही’ लस प्रभावी!

‘पीटीआय’शी बोलताना माध्यमांमधील वृत्तांच्या हवाल्याने त्यांनी म्हटले की, रुग्णालयांत जागा कमी आहे आणि त्यामुळे तात्पुरत्या असलेल्या ठिकाणी लोकांवर उपचार केले जात आहेत. डॉ. फाउसी यांनी सांगितले की, भारताने लष्कराच्या मदतीने युद्धा दरम्यान बांधण्यात येणारे फिल्ड हॉस्पिटल उभारण्याची गरज आहे. जेणेकरून करोनाबाधितांना योग्य उपचार करता येऊ शकतील.

भारतात कठीण परिस्थिती

भारतात ज्या पद्धतीनं करोनाचा फैलाव दिसून येतोय, त्यामुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजन आणि उपचारासाठी झगडावं लागतंय. औषधांचा काळाबाजार सुरू आहे. लोक आणि प्रशासन हतबल होताना दिसत आहेत. नियंत्रणाबाहेर जाणाऱ्या करोनामुळे भारत सध्या मोठ्या कठीण परिस्थितीतून वाटचाल करत आहे. देशासमोर काही आठवड्यांसाठी संपूर्ण हाच एकमेव पर्याय उपलब्ध राहतो, असेही त्यांनी म्हटले.

वाचा: फायजरची भारताला ७ कोटी डॉलरची मदत; लशीबाबत सरकारसोबत चर्चा सुरू

चीनने मागील वर्षी असेच पाऊल उचचले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांनीही असेच पाऊल उचलले होते. लॉकडाउन लागू केल्यामुळे संसर्गबाधितांचे प्रमाण कमी होते आणि संसर्गाची साखळी तुटत असल्याचे इतर देशांच्या अनुभवावरून लक्षात येते.

लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज

बायडन प्रशासनाचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. फौसी यांनी लसीकरण मोहिमेला जोर देण्याची गरजही व्यक्त केली. पुढच्या काही आठवड्यांत लसीकरण मोहिमेला वेग धेण्यात आला तर या परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकेल.

[ad_2]

Source link