Home ताज्या बातम्या Coronavirus In Maharashtra: राज्यात आज २८५ करोनाबळी; १५ हजार नवे रुग्ण, रिकव्हरी रेट ९४.५४ टक्के

Coronavirus In Maharashtra: राज्यात आज २८५ करोनाबळी; १५ हजार नवे रुग्ण, रिकव्हरी रेट ९४.५४ टक्के

0
Coronavirus In Maharashtra: राज्यात आज २८५ करोनाबळी; १५ हजार नवे रुग्ण, रिकव्हरी रेट ९४.५४ टक्के

हायलाइट्स:

  • राज्यात आज २८५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.
  • दिवसभरात १५ हजार १६९ नवीन रुग्णांचे निदान.
  • २९ हजार २७० रुग्णांनी केली करोनावर मात.

मुंबई: राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून दैनंदिन रुग्णसंख्या आजही तुलनेने कमीच राहिली आहे. गेल्या २४ तासांत १५ हजार १६९ नवीन रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी २९ हजार २७० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान, मृत्यूंचा आकडा आज २८५ पर्यंत खाली आला असून ही संख्या आणखी कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Update )

वाचा: राज्यात करोनामुक्त गाव योजना जाहीर; ‘त्या’ गावाला मिळणार ५० लाख!

राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळाला. एप्रिल महिन्यात या साथीने राज्यात थैमान घातले होते. दैनंदिन रुग्णसंख्येने ६७ हजारांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर ही लाट हळूहळू ओसरायला लागली आहे. रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहायला मिळाले असले तरी आता दैनंदिन आकडे १५ हजारांपर्यंत खाली आले आहेत. गेल्या दोन आठवड्यात ही लाट खऱ्या अर्थाने उतरणीला लागली आहे. राज्यात मंगळवारी करोनाचे १४ हजार १२३ रुग्ण आढळले होते. आज त्यात थोडी वाढ झाली. आज १५ हजार १६९ नवीन रुग्णांची भर पडली. महत्त्वाचे म्हणजे राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार २७० रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.५४ टक्के इतके झाले आहे. राज्यात सध्या करोनाचे २ लाख १६ हजार १६ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक २७ हजार ९९० रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत तर कोल्हापूर जिल्ह्यात १८ हजार ८६२, मुंबई महापालिका क्षेत्रात १८ हजार ४७८, ठाणे जिल्ह्यात १७ हजार ३४१ तर सातारा जिल्ह्यात १६ हजार ९७९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

वाचा:‘मातोश्रीने आमच्यासाठी दार बंद केले; आम्ही तिथे जाणे बंद केले नाही’

अशी आहे करोनाची राज्यातील आजची स्थिती:

– राज्यात आज २८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
– सध्या राज्यातील मृत्यूदर १.६७ % एवढा आहे.
– आज राज्यात १५,१६९ नवीन रुग्णांचे निदान.
– आज २९,२७० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ५४,६०,५८९ करोनामुक्त.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.५४ % एवढे झाले आहे.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५५,१४,५९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,७६,१८४ (१६.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात १६,८७,६४३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ७,४१८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा: करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा

Source link