हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार ०१७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण १३ हजार ०५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण ६६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या ६६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ९३ हजार ४०१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३५ टक्के एवढे झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- कल्याण रेल्वेस्थानकात पाणी तुंबले, लोकलसह लांबपल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आज लाखाच्या खाली
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खाली आली असून ती ९६ हजार ३७५ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १५ हजार ७६८ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण १३ हजार ६३२ इतके रुग्ण आहेत. तर, मुंबई महापालिका हद्दीत सध्या १० हजार ४२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर सांगलीत सक्रिय रुग्ण सर्वात जास्त आहेत. सांगलीत ही संख्या १० हजार ०१४ इतकी आहे. तर, कोल्हापुरात ही संख्या १० हजार ५३८ इतकी आहे. साताऱ्यात ही संख्या ६ हजार ५६६, रायगडमध्ये २ हजार ८१६, रत्नागिरीत २ हजार ८७५, सिंधुदुर्गात २ हजार ३६४, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ८६० इतकी आहे. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या २ हजार ३३५ इतकी झाली आहे.
क्लिक करा आणि वाचा- बरांजच्या साडेचार लाख टन कोळसा चोरीसंदर्भात चौकशी करा; वडेट्टीवार यांचे आदेश
यवतमाळमध्ये फक्त २५ सक्रिय रुग्ण
या बरोबरच, अहमदनगरमध्ये ४ हजार २१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, औरंगाबादमध्ये ४६४, नांदेडमध्ये ही संख्या ४५५ इतकी आहे. जळगावमध्ये ४९८, तसेच अमरावतीत ही संख्या १८० इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या २५ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- बकरी ईदनिमित्त रामदास आठवले राज्य सरकारकडे करणार ‘ही’ मागणी
५,६१,७९६ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ५६ लाख ४८ हजार ८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख २० हजार २०७ (१३.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६१ हजार ७९६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ४ हजार ०५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.