वाचा:करोनाचे थैमान: WHO कडून आणखी एका लशीला मंजुरी
वाचा:करोनाचा हाहा:कार: भारत-नेपाळ सीमेवरील २२ ठिकाणी एन्ट्री पॉईंट बंद
आदेश न पाळल्यास कारावास
ऑस्ट्रेलियानेही मागील १४ दिवसांपासून भारतात असलेल्या आपल्या नागरिकांना देशात परतण्यावर अनिश्चित बंदी लागू केली आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा कारावास किंवा मोठ्या रकमेचा दंड भरावा लागेल, असा इशाराही दिला आहे. ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी सांगितले की, भारतात संसर्ग बाधित होऊन ऑस्ट्रेलियात परतलेल्या अनेक नागरिकांना सध्या विलगीकरणात राहावे लागत आहे. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियात संसर्ग नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने हा आदेश दिल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
वाचा: भारतात करोनाचे थैमान; ‘या’ कारणांमुळे जगाला सतावतेय चिंता
वाचा: ‘या’ देशात करोनाचे मृत्यू तांडव; एकाच महिन्यात एक लाख जणांनी गमावले प्राण
आयर्लंडमध्ये विलगीकरण बंधनकारक
आयर्लंड सरकारने भारतात आलेल्या प्रवाशांना हॉटेलमध्ये विलगीकरण बंधनकारक केले आहे. विलगीकरण बंधनकारक केलेल्या देशांमध्ये भारतासह अन्य पाच देशांचा समावेश असून मंगळवारपासून हे आदेश लागू असतील, असेही स्पष्ट केले आहे. भारताशिवाय जॉर्जिया, इराण, मंगोलिया आणि कोस्टारिका या देशातून येणाऱ्या प्रवाशांना ४ मेपासून विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल. शुक्रवारी सरकारने जाहीर केलेल्या आदेशानुसार, विशिष्ट देशांतून आयर्लंडमध्ये येणाऱ्या प्रवाशांना हॉटेलमध्ये विलगीकरणात राहावे लागेल, त्यासाठी प्रवासापूर्वीच बुकिंग करणे आवश्यक असेल. त्याची बिलेही भरणे आवश्यक आहे. तसे न करणे गुन्हा मानला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.