Home ताज्या बातम्या Covid Third Wave तिसऱ्या लाटेचा धोका: ऑक्सिजनबाबत सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Covid Third Wave तिसऱ्या लाटेचा धोका: ऑक्सिजनबाबत सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

0
Covid Third Wave तिसऱ्या लाटेचा धोका: ऑक्सिजनबाबत सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हायलाइट्स:

  • ५० खाटांवरील रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक.
  • कोविडची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेत सरकारचा मोठा निर्णय.
  • वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली माहिती.

मुंबई: ‘गेल्या दीड वर्षांपासून आपण कोविड महामारीशी लढा देत आहोत. अजूनही कोविडची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची आवश्यकता मोठया प्रमाणावर निर्माण होत आहे. हे लक्षात घेता येणाऱ्या काळात ५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे बंधनकारक करण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितले. ( Amit Deshmukh On Covid Third Wave )

वाचा:करोना: आज राज्यात ७,३०२ नवे रुग्ण; ७,७५६ झाले बरे, तर १२० मृत्यू

अमित देशमुख म्हणाले की, कोविड रुग्णांची संख्या जरी आटोक्यात येत असली तरी कोविड रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत असते. त्यामुळे येणाऱ्या काळात रुग्णालयांनी स्वत: ऑक्सिजन निर्मिती प्लांट निर्माण करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र गेल्या दीड वर्षापासून कोविड परिस्थितीशी समर्थपणे मुकाबला करीत आहे. या काळात कोविडच्या चाचण्या करण्यासाठी शासकीय प्रयोगशाळा उभारणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड रुग्णालय तयार करणे, आवश्यक ती साधनसामुग्री निर्माण करणे, ऑक्सिजनची उपलब्धता निर्माण करणे यासारख्या अनेक उपाययोजना करण्यात आल्या. महाराष्ट्रावरील संकट अजूनही पूर्णपणे संपलेले नसून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्यात आवश्यक त्या उपाययोजना आणि खबरदारी घेण्यात येत आहे. आपले दैनंदिन जीवन पूर्ववत होण्यासाठी राज्य शासनाच्या या सर्व प्रयत्नात सर्वसामान्यांची साथ असणे तितकेच आवश्यक आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याची माहितीही यावेळी देशमुख यांनी दिली.

वाचा: महापुराचं संकट: मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेत दिले ‘हे’ आदेश

शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात महाराष्ट्र आघाडी घेईल

राज्यात कोविड संसर्ग वाढल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी गेल्या वर्षी मार्च महिन्यात शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदाला आणण्याचा प्रयत्न होत असताना शाळा- महाविद्यालये सुरू करण्यात महाराष्ट्र आघाडी घेईल, असा विश्वासही देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईत आयोजित एका सेमिनारमध्ये देशमुख बोलत होते.

वाचा:कोकणात ६ हजार रेल्वे प्रवासी अडकले; चिपळूणमधील स्थिती भीषण

Source link