Home ताज्या बातम्या Devendra Fadnavis: ‘महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात!’

Devendra Fadnavis: ‘महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात!’

0
Devendra Fadnavis: ‘महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात!’

हायलाइट्स:

  • मुंबईत भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक.
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले मार्गदर्शन.
  • ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीला केले लक्ष्य.

मुंबई:ओबीसी आरक्षण प्रश्नी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. ‘आपल्या चुकीमुळे ओबीसी आरक्षण गेल्याचे माहीत असल्याने सध्या या मुद्द्यावर राज्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते कमी बोलतात आणि त्यांचे बोलके पोपट जास्त बोलतात’, अशा शब्दांत फडणवीस यांनी निशाणा साधला. ( Devendra Fadnavis On OBC Reservation )

वाचा: फडणवीस सरकारच्या काळातही ‘पेगॅसस कांड’?; चौकशीची मागणी

मुंबई आयोजित भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. ओबीसी आरक्षण संपवण्याचे काम या सरकारने केले आहे. या मुद्द्यावर खोटे बोल पण रेटून बोल या पद्धतीने कारभार चालला आहे. आपली चूक झाली हे माहीत असल्याने सध्या महाविकास आघाडीचे नेते कमी बोलत आहेत आणि त्यांचे बोलके पोपट जास्त बोलत आहेत. मालक जसे सांगतात तसे हे पोपट बोलतात, असे टीकास्त्र फडणवीस यांनी सोडले. आपल्या काळात ओबीसी आरक्षण टिकले आणि आता मात्र राज्य सरकारने काहीच पावले न उचलल्याने हे राजकीय आरक्षण संपले. या सरकारने आधी केवळ न्यायालयात तारखा घेतल्या. जेव्हा न्यायालयात सरकार बोलले तेव्हा आरक्षण अतिरिक्त ठरते आहे, असे सांगून टाकले, असा आरोपही फडणवीस यांनी केला. मंत्री छगन भुजबळ यांनी माझी भेट घेतली. मी त्यांना संपूर्ण सहकार्य करीन, असे सांगितले आहे. काम करायचे असेल तर ते सहज शक्य आहे. मी हे जबाबदारीने सांगतो आहे, असेही फडणवीस पुढे म्हणाले.

वाचा: मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका या ‘एनसीपी स्पॉन्सर्ड’; फडणवीसांचा आरोप

प्रकरण ५ जिल्ह्यांचे होते आणि आरक्षण संपूर्ण राज्यातील गेले आहे. जनगणनेचा नव्हे तर एम्पिरिकल डेटा सरकारला द्यायचा होता पण केवळ दिशाभूल केली जाते आहे. राज्य सरकारला सारे माहिती आहे तरीही विधानसभेत ठराव केला गेला. या षडयंत्रामागे कारण आहे. फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन ते चार क्षेत्रात होणाऱ्या निवडणुकांवर डोळा आहे. तोपर्यंत सरकारला वेळ काढायचा आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. भाजपने या ओबीसी राखीव जागांवरील निवडणुकीत केवळ आणि केवळ ओबीसी समाजाला उमेदवारी देण्याचे ठरविले आहे. मग एखादा उमेदवार निवडून नाही आला तरी चालेल, पण यातून माघार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ओबीसी समाजासाठी अनेक योजना केंद्र सरकार स्तरावर सुरू करण्यात आल्या, असेही फडणवीस म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आशीष शेलार, मंगल प्रभात लोढा, संगम लाल गुप्ता, डॉ. संजय कुटे, अतुल भातखळकर, योगेश टिळेकर यावेळी उपस्थित आहेत.

वाचा:मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांवर आस्मानी संकट, हवामान खात्याकडून पुन्हा रेड अलर्ट

Source link