Home बातम्या राष्ट्रीय fire in transformer: रोहित्राला लागली आग; स्फोटाच्या भीतीने नागरिकांमध्ये घबराट

fire in transformer: रोहित्राला लागली आग; स्फोटाच्या भीतीने नागरिकांमध्ये घबराट

0
fire in transformer: रोहित्राला लागली आग; स्फोटाच्या भीतीने नागरिकांमध्ये घबराट

हायलाइट्स:

  • वाशिम जिल्ह्यात रोहित्राला आग लागण्याच्या घटना वरचेवर घडत असतात.
  • जिल्ह्यातील मानोरा शहराच्या नाईकनगर येथील विद्युत वितरण कंपनीचे रोहित्राला आग लागल्याची घटना आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली.रोहित्र सलग दीड तास जळत होते.
  • आता त्याचा स्फोट होईल की काय, या काळजीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

वाशिम: जिल्ह्यातील मानोरा शहराच्या नाईक नगर येथील विद्युत वितरण कंपनीचे रोहित्राला आग लागल्याची घटना आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली. तब्बल दीड तासानंतर नगर पंचायत अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवली. मात्र, रोहित्र सलग दीड तास जळत राहील्याने त्याचा स्फोट होईल या काळजीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (transformer caught on fire panic among citizens over fear of explosions)

आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मानोरा शहरातील नाईकनगर येथील रोहित्रास आग लागल्याची घटना घडली. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी याबाबत विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना याबाबत दूरध्वनीवरून माहिती दिली. परंतु विद्युत वितरण कंपनीचा एकही कर्मचारी एक तास होईपर्यंत घटनास्थळी पोहोचला नाही. तोपर्यंत नागरिकांनी नगरपंचायतीच्या प्रशासनाला कळवले होते.

नगरपंचायचे अग्निशामक दलाचे जवान ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल होण्यास काहीसा विलंब लागला. याचे कारण म्हणजे अग्निशमन वाहनाच्या टाकीत पाणी नसल्यामुळे आधी वाहन पाणी भरण्यासाठी गेले. त्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटांनी साडे अकरा वाजताच्या दरम्यान हे वाहन घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रोहित्राला लागलेली आग विझवण्यात आली.

क्लिक करा आणि वाचा- महाजनांच्या पाठपुराव्याने जळगावात २० मेट्रीक टन ऑक्सिजनचा टँकर

रोहित्राला आग लागण्याचे कारण कळू शकले नाही. मात्र तरी देखील नाईकनगर येथील रहिवाशांमध्ये रोहित्र सलग दीड तास जळत राहील्याने त्याचा स्फोट होईल या भीतीने दहशत निर्माण झाली होती. तसेच मानोरा शहराला लागून असलेल्या गावांमध्येही आज सकाळी सहा वाजताच्या दरम्यान रोहीत्र जळाल्यामुळे येथील नागरिकांना ही विनावीज राहण्याची पाळी आलेली आहे. मागील काही दिवसांमध्ये तालुक्यात रोहित्र बिगडण्याच्या घटनेत वाढ झाली असून यामुळे वीज खंडित होण्याच्या घटनाही वाढत आहे. याकडे विद्युत वितरण कंपनीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ५७ हजारांवर नवी रुग्णवाढ, ९२० मृत्यू
क्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींना पत्र लिहिणार: मुख्यमंत्री

Source link