Home मनोरंजन Indian Idol 12- पवनदीप राजनच्या हातून घडली मोठी चूक, मदतीला धावली सायली कांबळे

Indian Idol 12- पवनदीप राजनच्या हातून घडली मोठी चूक, मदतीला धावली सायली कांबळे

0
Indian Idol 12- पवनदीप राजनच्या हातून घडली मोठी चूक, मदतीला धावली सायली कांबळे

[ad_1]

हायलाइट्स:

  • इंडियन आयडल १२ मधील स्पर्धक पवनदीपकडून झाली ही चूक
  • विजेतेपदाचा प्रमुख दावेदार असलेल्या पवनदीपकडून चूक झाल्याने सर्वांना बसला धक्का
  • पवनदीपच्या मदतीला धावली सायली कांबळे

मुंबई : इंडियन आयडल १२ या रिअॅलिटी कार्यक्रमाचा प्रवास आता ग्रँड फिनालेच्या टप्प्यावर आला आहे. १५ ऑगस्ट रोजी ग्रँड फिनाले होणार आहे. आता सर्वच स्पर्धक त्याच्या तयारीत गर्क आहेत. आशिष कुलकर्णीचे एलिमिनेशन झाल्यानंतर आता कार्यक्रमात सहा स्पर्धक उरले आहे. त्यामध्ये पवदीप राजन, सायली कांबळे, निहार, शनमुखाप्रिया, अरुणिता कांजीलाल आणि मोहम्मद दानिश यांच्यामध्ये विजेतेपदासाठी चुरशीची स्पर्धा होणार आहे.

सर्वच स्पर्धक आपापले सादरीकरण अचूक कसे होईल याकडे बारकाईने लक्ष देत आहेत. असे असताना पवनदीपकडून एक मोठी चूक झाली. सूर आणि तालाच्याबाबतीत अतिशय परफेक्शनिस्ट असलेला पवनदीप १८ जुलै रोजी प्रसारित झालेल्या कार्यक्रमावेळी गाणे गात असताना चुकला. या एका गोष्टीमुळे त्याच्या विजेतपदाच्या मार्गावर अडथळा निर्माण झाला आहे.

काय घडले नेमके

इंडियन आयडल १२ कार्यक्रमामध्ये ८० च्या दशकामध्ये गाजलेली जोडी म्हणजे धर्मेंद्र आणि अनिता राज आले होते. या दोघांसमोर पवनदीपने ‘होठोंसे छुलो तुम, मेरा गीत अमर कर दो…’ हे गाण गात होता. हे गाणे ‘प्रेमगीत’ सिनेमातील असून ते राज बब्बर आणि अनिता राज यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. हे गाणे जगजीत सिंग यांनी गायले होते. अतिशय लोकप्रिय असे हे गाणे पवनदीप अतिशय सुंदर पद्धतीने गात होता. त्याच्या आवाजात मार्दव, तरलता होती. हे गाणे तो गात असताना सर्वजण तल्लीन झाले होते. इतकेच नाही तर हे गाणे ऐकताना अनिता राज यांना जुन्या आठवणींनी गहिवरून आले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले.

पवनदीप ‘ जब प्यारे करे कोई तो देखे केवल मन… ‘ ही ओळ गात असताना मध्येच अडखळला… कारण त्याने मनच्या ठिकाणी जीवन असे गायले. तो गाण्यातील शब्द विसरला. त्याला लगेचच आपली चूक लक्षात आल्याने तो थांबला. तो थांबल्यावर लगेचच सायली कांबळेने त्याला त्या ओळी गाऊन दाखवत गाण्यातील शब्दांची आठवण करून दिली. पवनदीपच्या या अडखळण्यामुळे सर्व स्पर्धकांसह परीक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे. पवनदीपची ही चूक त्याला महागात पडण्याची शक्यता आहे.

AssignmentImage-51395758-1626683652

अर्थात त्यानंतर पवनदीपला पुन्हा एकदा मंचावर गाण्याची संधी देण्यात आली. इतकेच नाही तर धर्मेंद्र यांनी त्याच्यासाठी खास घरून आणलेले पराठेदेखील दिले. परंतु पवनदीपला जरी दुसरी संधी मिळाली असली, तरी या चुकीचे दुष्परिणाम त्याला सहन करावे लागणार आहेत. कारण काही आठवड्यांपूर्वी कमी मते मिळालेल्या सवाई भटसोबत पवनदीप देखील होता. आता प्रेक्षक पवनदीपला कशा पद्धतीने मते देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

[ad_2]

Source link